Balen Shah: नेपाळच्या राजकारणात सध्या मोठी घडामोडी घटना दिसून येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने प्रस्थापितांना धक्का देत (आरएसपी) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आता देशाची सत्ता एका तरुण नेतृत्वाच्या हाती म्हणजेच बालेंद्र शाह ऊर्फ ‘बालेन’ यांच्या हाती जाणार आहे. येत्या २७ मार्च रोजी बालेंद्र शाह नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरएसपीला स्पष्ट बहुमत Balen Shah: ५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीत आरएसपीने १८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे नेपाळमधील जुन्या आणि प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का देत त्यांना घरी बसण्यास भाग पाडले आहे. आरएसपीने निवडणुकीपूर्वीच बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते, ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. पक्षाचे अध्यक्ष रवि लामिछाने, ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह आणि स्वर्णिम वाग्ले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शपथविधीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. Balen Shah: शपथविधीची सगळी जय्यत तयारी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी २६ मार्च रोजी पार पडेल आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २७ मार्चला बालेंद्र शाह पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे, नेपाळच्या संसदेचे नवीन भवन अजूनही पूर्णपणे तयार नसल्यामुळे हा सोहळा एका तात्पुरत्या हॉलमध्ये आयोजित केला जाणार आहे. संसद सचिवालयाचे प्रवक्ते एकराम गिरी यांनी याविषयी माहिती देताना, “कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे” असे सांगितले. गगन थापांचा राजीनामा Balen Shah: या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी १०० पारची घोषणा देणाऱ्या नेपाळी काँग्रेसला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गगन थापा यांचा आरएसपीच्या अमरेश सिंह यांनी पराभव केला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गगन थापा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय सीपीएन-यूएमएलला २५, तर कम्युनिस्ट पार्टीला १७ जागा मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यवाह मुख्य आयुक्त राम प्रसाद भंडारी यांनी निवडणुकीचे अंतिम निकाल राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना सादर केले. अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले आहे.