Bachchu Kadu : बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयावर परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कडूंवर गंभीर आरोप केले आहेत. (Bachchu Kadu) विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष विलीन करत आमदारकी मिळवली. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधले यांनी बैठक घेऊन कडूंवर जोरदार टीका केली. “प्रहार हा स्वाभिमानाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एका आमदारकीसाठी पक्षाला दुसऱ्यांच्या दावणीला बांधण्याचा अधिकार कडूंना कोणी दिला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Bachchu Kadu) तसेच, एवढा मोठा निर्णय घेताना राज्यातील एकाही जिल्हाप्रमुख किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. हा निर्णय केवळ वैयक्तिक फायद्यासाठी घेतल्याचा घणाघात करत कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्याशी खेळ केल्याचेही त्यांनी म्हटले. (Bachchu Kadu) पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. हजारो कार्यकर्त्यांचा बळी देऊन मिळवलेली आमदारकी तुम्हालाच लखलाभ असो.” लवकरच पक्षातील पुढील भूमिका आणि नवा मार्ग ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Bachchu Kadu) हेही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू पुन्हा शिवसेनेत जाणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर कडूंनी सोडले मौन Eknath Shinde : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय