क्रिकेटपटूंवरही प्रश्नचिन्ह –
\nऐशन्याने क्रिकेटपटूंवरही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “आमचे क्रिकेटपटू काय करत आहेत? एक-दोन खेळाडूंखेरीज कोणीही पुढे येऊन पाकिस्तानविरुद्ध सामन्याचा बहिष्कार करावा, असे सांगितले नाही. क्रिकेटपटूंना राष्ट्रवादी म्हणतात, पण बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या टोकावर खेळायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी देशासाठी उभे राहायला हवे, पण ते तसे करत नाहीत.”
सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी –
\nसोशल मीडियावरही या सामन्याच्या बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सामना न खेळण्याची मागणी केली आहे. तरीही हा सामना नियोजित वेळेनुसार होणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळवण्याचा निर्णय अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला आहे.