AIMIM महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवणार? ; ओवेसींनीच स्पष्ट केली भूमिका, सांगितले कुणाशी करणार युती?

Asaduddin Owaisi । महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय. दरम्यान, यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ताकदीने लढणार असल्याचा दावा एआयएमआयएमच्या नेत्यांनी केलाय. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीच याविषयी माहिती दिली आहे. एका पत्रकार परिषदेत ओवेसी यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावणार असल्याचे म्हटले आहे.
पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत माहिती दिली. त्यांनी “आज आम्ही कुठे मजबूत होऊ शकतो याचा आढावा घेतला आहे.”पण मी आत्ता तुम्हाला नंबर सांगू शकणार नाही. निश्चितच आम्ही अनेक ठिकाणी निवडणूक लढवू आणि जिंकूनही दाखवू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
AIMIM कोणासोबत युती करणार ? Asaduddin Owaisi ।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘आजच्या स्थितीत आपण एकटे आहोत. जर कुठून युतीची चर्चा सुरू झाली तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र अद्याप कोणाशीही चर्चा सुरू झालेली नाही. AIMIM कडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तरी चालेल. पण आज आपल्यासोबत विविध जाती-धर्माचे लोक आहेत. ते AIMIM मध्ये सामील होत आहेत.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी आगामी काळात राजकारणात बरेच बदल पाहायला मिळतील,” असेही इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात दररोज काही ना काही राजकीय घडामोडी घडत आहेत. येत्या काही दिवसांत बरेच बदल होणार आहेत. त्यानंतर कोणाला सोबत घ्यायचे याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते यावेळी म्हणाले.
लोकसभेच्या निकालावर ओवेसी काय म्हणाले? Asaduddin Owaisi ।
दरम्यान, AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाविषयी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी याविषयी बोलताना, “जरांगे साहेबांचा मी खूप आदर करतो आणि त्यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात 8 मराठा खासदार यशस्वी झाले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रात एकही मुस्लिम खासदार नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे खासदार विजयी झाले. मात्र एकही मुस्लिम खासदार विजयी झाला नाही. तर ही आहे आपल्या भारताची लोकशाही. हे लोकशाहीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे.” असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात प्रत्येक समाजाचे खासदार विजयी झाले आहेत आणि जर एका समाजाचा उमेदवार जिंकला नसेल तर तो मुस्लिम समाजाचा आहे. त्यामुळे सर्व जबाबदार लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. इम्तियाज जलील साहेबांना औरंगाबादमधून यश मिळाले नाही, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात दु:ख किंवा संताप आहे, कारण त्यांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले आहे. प्रश्न असा आहे की, जर मुस्लीम समाज प्रत्येकाला मतदान करत असेल तर ते आम्हाला मत का देत नाहीत?” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
“मनोज जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडावा आणि बारामतीत…”; सदाभाऊ खोत यांचे आवाहन





