Arvind Kejriwal : दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’चा कट रचला जातोय” असा गंभीर आरोप आपकडून करण्यात आला आहे. भाजपने आपमधील सात आमदारांशी संपर्क साधला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात अटक केली जाऊ शकते अशी अफवा पसरवल्याचा दावा आपकडून करण्यात आला आहे. …आणि मग आमचं सरकार पडणार यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट करत भाजपवर हल्ला चढवला आणि दावा केला की भाजप दिल्लीतील आप आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच भाजपने आमच्या दिल्लीतील 7 आमदारांशी संपर्क साधला आणि काही दिवसांनी केजरीवाल यांना अटक करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार फोडू, 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. उर्वरित आमदारांशीही आम्ही बोलत आहोत.असे भाजपने म्हटले असल्याचे मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे. ‘आमदारांना 25 कोटींची ऑफर…’ मुख्यमंत्र्यांच्या अटकेनंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. 25 कोटी देणार आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार. मात्र, त्यांनी 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पण आमच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत फक्त 7 आमदारांशी संपर्क साधला असून सर्व आमदारांनी त्यांची ऑफर नाकारली आहे. ‘सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे’ केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पुढे दावा केला की, “याचा अर्थ असा आहे की, मला कोणत्याही दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी अटक केली जात नाही तर ते दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा कट रचत आहेत.” गेल्या नऊ वर्षांत भाजपने आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कारस्थानं केली, पण त्यात यश आले नाही. देव आणि जनतेने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. आमचे सर्व आमदारही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यावेळीही हे लोक त्यांच्या हेतूत अपयशी ठरतील.असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पुढे ट्विटमध्ये, “आमच्या सरकारने दिल्लीतील जनतेसाठी किती काम केले हे या लोकांना माहीत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही खूप काही साध्य केले आहे. दिल्लीतील लोकांचे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे निवडणुकीत ‘आप’चा पराभव करणे त्यांच्या अखत्यारीत नाही, अन्यथा त्यांना बनावट दारू घोटाळ्याच्या निमित्ताने अटक करून सरकार पाडायचे आहे.असे म्हटले गेले आहे.