Political News : देशाच्या राजकारणात खळबळ; आणखी २५ ते २६ खासदार फुटणार?
Political News : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या पक्षाचे तब्बल २५ ते २६ खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत.

Political News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर आता उत्तर प्रदेशच्या राजकारणातही मोठ्या पक्षफुटीची चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाचे (SP) 25 ते 26 खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. मात्र, या दाव्यांना समाजवादी पक्षाने स्पष्टपणे फेटाळले असून पक्ष एकजूट असल्याचा दावा केला आहे. (Political News)
कानपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, समाजवादी पक्षातील अनेक खासदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांनी असा दावा केला की, 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक नेते स्वतःहून समाजवादी पक्ष सोडतील. (Political News)
ओम प्रकाश राजभर यांचाही दावा
याआधी मंत्री ओम प्रकाश राजभर यांनीही सोशल मीडियावर समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी पक्षातील काही घडामोडींचा उल्लेख करत मोठ्या राजकीय बदलांचे संकेत दिले. (Political News)

समाजवादी पक्षाचे प्रत्युत्तर
विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी राजभर यांच्यावर टीका करत, “ओम प्रकाश राजभर हे स्वतःच एक ‘स्कॅम’ आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राज्यात हुकूमशाही सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. Political News()
दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपचे सर्व दावे फेटाळले. समाजवादी पक्ष पूर्णपणे एकसंध असून कोणतीही फूट पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विरोधी पक्षांतील नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करणे ही भाजपची जुनी राजकीय रणनीती असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Political News)



