Anil Kumble : भारतीय क्रिकेटचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) संघ व्यवस्थापनावर कडक शब्दांत टीका केली आहे. २०२४ मध्ये विजेतेपद मिळवून दिल्यानंतरही श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्ट यांना संघातून मुक्त करण्याचा निर्णय केकेआरला महागात पडू शकतो, असा इशारा कुंबळे (Anil Kumble) यांनी दिला आहे. कुंबळे यांच्या मते, श्रेयस आणि सॉल्ट हे केकेआर संघाच्या विजयाचे मुख्य आधारस्तंभ होते. श्रेयसने नंतर पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेले, तर सॉल्टने आरसीबीला त्यांचे पहिले विजेतेपद मिळवून दिले. या खेळाडूंना सोडून देणे हे कोलकाता संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी घातक ठरेल. कोलकाता संघाकडे आता आयपीएल ट्रॉफी जिंकलेला कर्णधार उरलेला नाही. जरी अजिंक्य रहाणे अनुभवी असला, तरी कर्णधार म्हणून त्याच्याकडे आयपीएल विजेतेपदाचा अनुभव नाही, असे कुंबळे म्हणाले. Anil Kumble KKR ते पुढे म्हणाले की, श्रेयस हा एक कमी लेखलेला परंतू अपवादात्मक नेता आहे. तब्बल १० वर्षे अंतिम फेरी न गाठलेल्या पंजाब किंग्जला त्याने पहिल्याच प्रयत्नात फायनलपर्यंत नेले, हे त्याच्या नेतृत्वाचे यश असल्याचे कुंबळे म्हणाले. Anil Kumble ही जोडी जास्त विध्वंसक Anil Kumble भारताचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या मते, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी आरसीबीच्या प्रसिद्ध विराट कोहली-ख्रिस गेल जोडीपेक्षाही अधिक विध्वंसक आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच हैदराबादचा संघ सातत्याने २५०+ धावांचा टप्पा ओलांडू शकले आहेत. मात्र, हैदराबादचा संघ घरच्या मैदानावर जेवढा प्रभावी आहे, तेवढाच तो ‘अवे गेम्स’मध्ये कामगिरी सुधारण्यात मागे पडतो, असेही पुजाराने नमूद केले.