भारतीय टी-२० संघाचा पुढील नियमित कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) पहिले जात आहे. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला अपयश आले. त्यामुळे अनेकांनी रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मग टी-२० संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहितला उत्तम पर्याय म्हणून हार्दिक पंड्याच्या नावाची चर्चा सुरु झाली. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer ) भारतीय क्रिकेट संघातून वगळल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. व्यंकटेश अय्यरच्या मते, हार्दिक पंड्याचे संघात पुनरागमन झाल्याने त्याला संघातून वगळण्यात आले.
“ऋषभ पंत संघावर ओझे बनला असून त्याला बाहेरचा रस्ता दाखवा”, माजी खेळाडूचं वक्तव्य!
व्यंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer ) आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना जबरदस्त कामगिरी होती. अय्यरची आयपीएल २०२१ हंगामातील स्फोटक कामगिरीमुळे भारतीय संघात निवड करण्यात आली होती. अय्यरने २०२१ आयपीएलमधील १० सामन्यांमध्ये चार अर्धशतके झळकावत ३७० धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने गोलंदाजी करण्याची क्षमताही दाखवली आहे. मात्र त्याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तो कामगिरीत कमी पडला आणि लवकरच त्याला संघाबाहेर बसण्यात आले. व्यंकटेश अय्यरच्या मते, पंड्याने ( Hardik Pandya ) त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.
“ऋषभ पंत संघावर ओझे बनला असून त्याला बाहेरचा रस्ता दाखवा”, माजी खेळाडूचं वक्तव्य!
व्यंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer ) म्हटले की, “भारतीय संघाकडून जास्त काळ खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मलाही तेच हवे होते पण हार्दिकचे पुनरागमन झाले आणि त्याने काही सामन्यांत जबरदस्त कामगिरी केली. प्रत्येक संघाला विश्वचषकासाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करायची असते. मलाही संघाचा भाग व्हायचे होते मात्र ते माझ्या हातात नाही.”
व्यंकटेश अय्यर पुढे म्हणाला की, “मी नेहमीच क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी शोधत असतो. जर मी भारतीय संघासाठी खेळलो नाही, तर मला आयपीएल किंवा माझ्या राज्य संघाकडून खेळण्याची संधी आहे. माझे काम खेळाकडे लक्ष देणे आणि निवडीची चिंता न करणे हे आहे. मी दुर्दैवाने दुखापती झालो. आता जेव्हा मी खेळेल तेव्हा मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन आणि इतर कशाचीही चिंता करणार नाही.”