Ajit Pawar – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांचे कौतुक करणारे, कामात दिरंगाई झाल्यास किंवा अधिकाऱ्याची तक्रार येताच त्यांचे कान टोचणारे, बैठकीत मिश्लिकपणे उत्तरे देणाऱ्या अजितदादा पवार यांची उणिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जाणवली.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुनेत्रा पवार होत्या. यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पाटील म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यपद्धतील सुक्ष्म अभ्यासातून भविष्याचा वेध घेण्याचा आग्रह करणारे व्यक्तीमत्व होते. राज्याच्या प्रगतीत त्यांचे फार मोठे योगदान होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक खऱ्याअर्थाने वेळेत सुरू करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे, अशा शब्दात पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यासह पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. राज्यासह पुणे जिल्ह्याची प्रगती करुन सर्व क्षेत्रात पुढे जावे हा त्यांचा मानस होता, त्यादृष्टीने सर्वांना सोबत घेवून त्यांना न्याय देण्याची त्यांची भुमिका होती. पायाभूत विकासाच्यादृष्टीने त्याचे आदर्श, विचार, कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा प्रगतीचा आलेख पुढे नेण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करुया, अशा शब्दांत भरणे यांनी आपले विचार व्यक्त केले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच विरोधी पक्षनेता अशा विविध भुमिकेत आपली जबाबदारी पार पाडली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने कामे करीत असतांना विविध विकास मार्गी लागली. पायाभूत विकासाचे प्रकल्पाचे सादरीकरण समजून घ्यायचे, त्यामध्ये आवश्यतेनुसार बदल सूचवायचे. गोरगरीब सामान्य नागरिकांचे प्रश्न तळमळीने सोडवून त्यांना न्याय देण्याची त्यांची भुमिका होती.राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम करिता जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील झुंबर सभागृहात विविध बैठकीत आयोजित करण्यात आल्या.