अनर्थ टळला ! मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचे विमान घसरले ; तिन्ही टायर फुटले

Air india three tyres burst। मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. केरळमधील कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे झालेल्या या अपघातात विमानाचे तिन्ही टायर फुटले. दिलासादायक गोष्ट म्हणजे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
ही घटना घडली तेव्हा मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे लँडिंग करणे खूपच आव्हानात्मक होते आणि त्यामुळे एअर इंडियाचे विमान AI2744 धावपट्टीवरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
एअर इंडियाने निवेदनात काय म्हटले ? Air india three tyres burst।
एअर इंडियाने या घटनेबद्दल सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. एअरलाइन प्रवक्त्याने सांगितले की, ‘२१ जुलै रोजी कोचीहून मुंबईला जाणारे विमान AI2744 मुंबई विमानतळावर लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पुढील तपासासाठी विमान थांबवण्यात आले आहे.’
मुंबई विमानतळानेही निवेदन केले जारी Air india three tyres burst।
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नेही या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. CSMIA ने म्हटले आहे की, ‘२१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:२७ वाजता, कोचीहून येणारे एक विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना घसरले. घटनेनंतर लगेचच, CSMIA चे आपत्कालीन प्रतिसाद पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
सर्व प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना विमानातून ताबडतोब बाहेर काढण्यात आले. ते सर्व सुरक्षित आहेत. मुख्य धावपट्टी ०९/२७ ला किरकोळ नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. कामकाज सुरू राहावे यासाठी, दुय्यम धावपट्टी १४/३२ सक्रिय करण्यात आली आहे. CSMIA मध्ये सुरक्षितता ही नेहमीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते.’





