Engineering Colleges Closed : महाराष्ट्रासह १४ राज्यातील ५८ इंजिनिअरिंग कॉलेज बंद? काय आहे कारण?
Engineering Colleges Closed : अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Engineering Colleges Closed : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात देशभरातील ५५ हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र, सध्याच्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी पूर्ण करण्याची मुभा दिली जाईल, अशी माहिती ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात एआयसीटीईने दिली. (Engineering Colleges Closed)
एआयसीटीईने दिलेल्या माहितीनुसार, या ५८ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रोग्रेसिव्ह क्लोजर म्हणजेच टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, विविध कॉलेजेस मधील तब्बल ९५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम देखील कायमचे बंद करण्यात आले आहेत. (Engineering Colleges Closed)
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. एआयसीटीईने स्पष्ट केले आहे की, ज्या कॉलेजना ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ मंजूर झाले आहे, त्यांना यावर्षीपासून पहिल्या वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. (Engineering Colleges Closed)
मात्र, जे विद्यार्थी आधीपासूनच तिथे शिकत आहेत, त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची पूर्ण परवानगी असेल. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या बंद झालेल्या ५८ संस्थांमध्ये खासगी महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. (Engineering Colleges Closed)
एकूण संस्थांपैकी फक्त ३ सरकारी अनुदानित आहेत, तर बाकी सर्व खासगी आहेत. राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. (Engineering Colleges Closed)
मध्य प्रदेशमध्ये ८ महाविद्यालये, तेलंगणा आणि पंजाब मध्ये प्रत्येकी ४ महाविद्यालये आंध्र प्रदेश आणि राजस्थान मध्ये प्रत्येकी ३ महाविद्यालये, गुजरात आणि कर्नाटक मध्ये प्रत्येकी २ महाविद्यालये याशिवाय पुणे, तामिळनाडू, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १ कॉलेज बंद झाले आहे. (Engineering Colleges Closed)





