Shetkari Karjmafi : कृषी कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; राज्यभरातील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ
Shetkari Karjmafi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५,०२९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

Shetkari Karjmafi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या 5029 कोटी रुपयांचा हा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. या रकमेतून 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. (Shetkari Karjmafi)
या योजनेची अंमलबजावणी करत असताना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल, दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम वर्ग केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Shetkari Karjmafi)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत आषाढी एकादशीला आपण पहिली यादी घोषित केली होती. घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली होती. शेतकऱ्यांनी केवळ आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे. कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही.
अॅग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची अशा प्रकारचे आपण काम हातामध्ये घेतले होते, आज जवळपास 5029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. (Shetkari Karjmafi)
शेतकऱ्यांचे मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की की आमच्यावरच कर्ज जास्ती दिसत आहे आणि आमच्या नावावर मंजूर पैसे कमी आहेत. त्याचं कारण जे काही एनपीए वर लावलेले व्याज होते, त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होते. (Shetkari Karjmafi)
बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधील पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे म्हणजे कर्जाचे अकाऊंटमधील पैसे आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. (Shetkari Karjmafi)
नवीन कर्ज घेताना अडचण येणार नाही
अजूनही म्हणजे जवळपास हे 18 ते 19 लाख खाती जे आहेत त्याची प्रोसेस चालली आहे. 12 लाख खाती जी आहेत ती बँकांना परत पाठवलेली आहेत. कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी साधारणपणे आठवड्याभरामध्ये त्या खात्यांमध्ये सुधारणा करुन पाठवणार आहे. (Shetkari Karjmafi)
आम्ही या योजनेत दोनच टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व कर्जमाफीचे पैसे भरतो आहोत. दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे देणार आहोत. कर्जमाफी झाल्यानंतर नवं कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येणार कोणतीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Shetkari Karjmafi)





