Devendra Fadnavis On Aaditya Thackeray | राज्यासह देशभरात सध्या मतदार यादीतील घोळ प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या मेळाव्यात वरळीतील मतदार यादीतील घोळाबाबत सादरीकरण केले. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा राहुल गांधी बनू नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत म्हंटले की, “मी आदित्य ठाकरे यांना चांगला ओळखतो. त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये, राहुल गांधी यांनी मोठी स्क्रीन लावून इकडून तिकडून फिरू नये. खोदा पहाड निकला चुहा असे होते. सोमवारी आदित्य ठाकरे यांनीही तेच केले. त्यांनी राहुल गांधी बनू नये,” असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केला. Devendra Fadnavis On Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी प्रमाणे स्क्रिन लावून आरोप केले. मात्र, त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. निवडणूक आयोगानेही या आक्षेपांने उत्तर दिली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी असा प्रकार करू नये, असे फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी मतचोरीवरून राज्य सरकार आणि आयोगावर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांनी प्रेझेंटेशन करत मतचोरी होत असल्याचा आरोप केला होता. Devendra Fadnavis On Aaditya Thackeray | निवडणूकांमध्ये वोटचोरी म्हणजे निवडणूक चोरी – आदित्य ठाकरे सध्या देशभरात सर्व निवडणूकांमध्ये वोटचोरी म्हणजे निवडणूक चोरी. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार येणार वाटत होते, पण तेव्हा हा गैरप्रकार पकडता आला नाही. ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाही, तर मतदारयादी हातात घेऊन होईल, असे ठाकरेसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले होते. हेही वाचा : सुपरहिट ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज; कधी आणि कुठे पाहता येणार?