यवतमाळ – अमरावतीवरून यवतमाळला येणाऱ्या एसटी आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघतात चौघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास झाला.
राधेश्याम इंगोले, रजनी इंगोले (दोघेही रा. यवतमाळ), वैष्णवी गावंडे (रा. वाशिम) आणि सारीका चौधरी (रा. पुसद यवतमाळ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी चौधरी, प्रमोद चौधरी, सारीका गावंडे आणि संतोष गावडे अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावंडे, चौधरी आणि इंगोले कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे 3 डिसेंबर रोजी अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे लग्न होते. हा लग्नसोहळा अटोपून ते सर्वजण आज सकाळी यवतमाळकडे परत येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटीने कारला समोरून जोरदार धडक दिली.
राज्यात 300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या अपघातप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.