Abhishek Fifty Deducted : अर्धशतक ठोकूनही स्कोरकार्डवर फक्त ४९ धावांचीच नोंद; आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर अभिषेकसोबत नेमका काय झाला गेम?
Abhishek Fifty Deducted : आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला दुहेरी झटका देणारा बसला.

Abhishek Sharma 49 Runs Fifty Deducted IND vs IRE 1st T20I Belfast : बेलफास्ट येथे भारतीय क्रिकेट संघासाठी आयर्लंड दौऱ्याची सुरुवात एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली आहे. दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान आयर्लंडने विश्वविजेत्या टीम इंडियाला ३४ धावांनी धूळ चारली. दोन वेळचा विद्यमान टी-२० विश्वविजेता संघ आयर्लंडसारख्या छोट्या संघासमोर पूर्ण २० षटकेही खेळू शकणार नाही, असा विचार कोणीही केला नव्हता. मात्र, भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्यासाठी हा सामना दुहेरी झटका देणारा ठरला.
भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागलाच, पण सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माच्या खात्यातील एक धाव कमी करण्यात आली, ज्यामुळे त्याचे शानदार अर्धशतकही हिरावले गेले. नेमका काय गोंधळ झाला जाणून घेऊया.
अभिषेक शर्माने १९ चेंडूत झळकावलं विक्रमी शतक –
Abhishek Sharma doing what he does best 💥
The #TeamIndia opener cruises to a 1️⃣9️⃣-ball FIFTY 👊
Updates ▶️ https://t.co/gdoXw2dAKR#IREvIND | @OfficialAbhi04 pic.twitter.com/b2semHbeOh
— BCCI (@BCCI) June 26, 2026
या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन अपयशी ठरले. परंतु, दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माचे वादळ पाहायला मिळाले. त्याने पहिल्या षटकापासूनच चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या १९ चेंडूंत आपले अर्धशतक (५० धावा) पूर्ण केले. २० व्या चेंडूवर तो बाद झाला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत अर्धशतक ठोकण्याची त्याची ही ५ वी वेळ होती.
सामना संपताच बदलली कहाणी; ‘असं’ हिरावलं अर्धशतक!
अभिषेक बाद झाला आणि भारतीय संघ १८.५ षटकात १४८ धावांवर ऑलआऊट झाला. खरा ड्रामा सामना संपल्यानंतर सुरू झाला, जेव्हा अधिकृत स्कोरकार्डवर अभिषेक शर्माच्या नावापुढे ५० ऐवजी ४९ धावा दिसू लागल्या. सुरुवातीला ही तांत्रिक चूक वाटली, पण नंतर यामागील खरे आणि मन विषण्ण करणारे कारण समोर आले.
झाले असे की, भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर १ धाव आली होती. ही धाव ऑन-फिल्ड पंचांनी चुकून अभिषेकच्या खात्यात जोडली होती. मात्र, सामना संपल्यानंतर रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले की तो चेंडू बॅटला न लागता पॅडला लागून गेला होता, म्हणजेच ती धाव ‘लेग बाय’ होती. नियमानुसार ही चूक सुधारण्यात आली आणि अभिषेकच्या खात्यातून १ धाव वजा करण्यात आली. या एका धावेमुळे अभिषेक शर्माचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील एक ऐतिहासिक अर्धशतक हुकले.






