Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंकडून महाराष्ट्रातील ‘या’ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले “मंत्री, आमदार, खासदारांनी स्वतःची मुलं…”
Abhijeet Dipke: शाळांची परिस्थिती न बदलल्यास गावागावात आंदोलन उभारण्याचा दिपकेंचा इशारा

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटीविरोधातील झालेल्या आंदोनाला मोठे यश मिळाले. अखेर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर अभिजित दिपके यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शाळेला त्यांनी भेट दिली.
मुख्याधापकांच्या बदलीसाठी त्यांनी आग्रह धरला. कारण येथील शाळेतील मुख्याध्यापकांचा दारू प्यायल्याचा व्हिडीओ समोर आणल्या होता. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी मुख्याध्यापकाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. जर मुख्याध्यापकांची बदली झाली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
यानंतर अभिजीत दिपके यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळेंच्या अवस्थेवर भाष्य केलं. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मंत्री, आमदार, खासदार, शिक्षणमंत्र्यांनी स्वतःची मुलं आधी जिल्हा परिषद शाळेत घातले पाहिजे. मुलांना एक दिवस खराब रस्त्यावरून पायी शाळेत पाठवले पाहिजे, म्हणजे त्यांना कळेल विद्यार्थ्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते.”
या सगळ्याला जबाबदार कोण?
“काही आदिवासी मुले मृत्यू पावली. सरकारच्या अपयशामुळे ही मुले मृत्यू पावली. उजनीच्या या शाळेत देखील साप निघाले आहेत, क्लास रूममधे देखील साप निघत आहेत. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले तर या प्रश्नावर भेटू, असंही ते यावेळी म्हणालेत. ग्रामीण भागातील शाळेतील समस्यांचा प्रश्न गावकऱ्यांनासोबत घेऊन आवाज उठवू आणि तो आवाज मुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेऊ,” असंही अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं आहे.
विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर…
पुढे दिपके म्हणाले, “केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसारखे येथे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, आता ते म्हणतील मागच्या सरकारचे दोष आहे, आम्ही आता निवडून आलो. मात्र, परिस्थिती अद्यापही बदलली नाही. शाळेवर आणखीनही पत्रे आहेत. मुलांना बसायला बेंच नाहीत, कुठे शौचालयाचीही व्यवस्था नाही, धक्कादायक म्हणजे काही झेडपी शाळांनी तर चक्क खासगी शाळांमधले विद्यार्थी झेडपीच्या शाळेत आणून बसवलं.” Abhijeet Dipke
“विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची? शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिज. शाळांची हीच परिस्थिती राहिली तर गावागावात आंदोलने उभी राहतील,” असा इशाराही दिपके यांनी दिला.
दरम्यान, सरकारी शाळांमधील भीषण वास्तव सीजेपीने समोर आणल्याने शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. त्यामुळे दादा भुसेंच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक भूमिका घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Abhijeet Dipke
हेही वाचा:
Green Cover Pune: १०८ कोटींचा धुरळा! पण हरित पुणे अवघे १० टक्के; महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर






