Maharashtra Politics : सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद? “पुढच्या 15 दिवसांत…”; बड्या नेत्याचं भाकित! शिंदे-ठाकरेही…
Maharashtra Politics : पुढच्या पंधरा दिवसांत शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येतील, असा दावा त्यांनी केला आहे.

MLA Ravi Rana makes a major claim : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळे आगामी काही दिवसात नवी राजकीय समीकरणे स्थापित होण्याचे संकेत मिळत आहेत. जयंत पाटलांच्या सलग भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. (Maharashtra Politics)
या चर्चा सुरू असतानाच युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. पुढच्या पंधरा दिवसांत शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येतील, असा दावा त्यांनी केला आहे. हा दावा करून न थांबत राणा यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे देखील एकत्र येऊ शकतात असं भाकित वर्तवलं आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
Earphone Side Effects: तरुणांमध्ये वाढतोय ऐकू कमी येण्याचा त्रास; कारण ठरतोय इअरफोनचा अतिवापर
नेमकं काय म्हणाले रवी राणा? (Maharashtra Politics)
“राजकारणात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. पुढील १५ दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. सुप्रिया सुळे केंद्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावतील, तर सुनेत्रा पवार राज्यातील नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारू शकतात. केंद्रात सुप्रिया सुळे मंत्रीपदाची धुरा सांभाळतील” असं राणा यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेही पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : तटकरे (Maharashtra Politics)
महायुतीत अर्थ खात्यावरुन देखील मोठं घमासान सुरू आहे. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर अर्थखात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुन्हा दिलं जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्यापर्यंत यावर निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. “अर्थ खाते हे आमच्याकडेच राहावे याकरिता आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. सुनेत्रा पवार यांच्यासह आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.” असं तटकरे म्हणाले.





