Uddhav Thackeray : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ७ फेब्रुवारीला यासाठी मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच भाजपने ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देत शिवसेना ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याला गळाला लावले आहे. या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या हाती कमळ घेतले आहे. त्यामुळे आता स्थानिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देत हाती कमळ घेतले आहे. त्यामुळे भाजपचे ताकद वाढली आहे. Maharashtra Politics संपूर्ण तालुका भाजपमय करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कंबर कसली आहे. एकमेव विरोधात म्हणून शिल्लक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या तालुका प्रमुखाचा देखील भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी घडामोडींकडे लक्ष असणार आहे. एवढे मात्र नक्की की भाजपचे बळ वाढत असून, ठाकरेसेनेची ताकद कमी पडत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. चार नगरसेवकांवर अपात्रेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवलीमधील चार नगरसेवक निवडणूक झाल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या चार नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची प्रक्रिया पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. कोणताही प्रतिसाद नाही स्वप्नाली केणे,कीर्ति ढोणे, मधुर म्हात्रे, आणि राहुल कोट हे उमेदवार विजयानंतर पक्षाच्या संपर्कात नाहीत. गटनोंदणी वेळी देखील हे चारही हजर नव्हते. ते बेपत्ता असल्याची तक्रार पक्षाकडून पोलिसांमध्ये करण्यात आली होती. पक्षाकडून वारंवार या चारही जणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. हेही वाचा : Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार ‘हे’ सर्वात मोठे आव्हान; सामना कसा करणार?