Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा ७ वा खासदारही फुटला, सहीही झाली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics : ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला असून त्याची सहीही झाली आहे, असा दावा एका बड्या नेत्याने केला आहे. हा खासदार मंत्रीपदाची मागणी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याच्या राजकीय घडामोडींमध्ये आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर‘च्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला असून त्याची सहीही झाली आहे, असा दावा केला. तसेच हा खासदार मंत्रीपदाची मागणी करत असल्याचेही त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत. सातव्या खासदाराचीही सही झाली आहे. तो माझ्या शेजारी बसला होता आणि मंत्रीपद मागत होता,” असा दावा त्यांनी केला. (Maharashtra Politics)
‘बाळासाहेबांचे नेतृत्व वेगळे होते’ (Maharashtra Politics)
रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांमध्ये वेगळी ऊर्जा होती. “दसरा मेळाव्यासाठी लाखो शिवसैनिक जमायचे. त्यांनी कधीही स्वतःसाठी पद घेतले नाही, उलट कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचा एक शब्द म्हणजे आदेश असायचा,” असे ते म्हणाले. (Maharashtra Politics)
‘उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे’ (Maharashtra Politics)
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना कदम म्हणाले, “जर बाळासाहेबांचा मार्ग स्वीकारला असता तर शिवसेना आज क्रमांक एकचा पक्ष असता. काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाची घसरण सुरू झाली. अनेक आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत आहेत. यामागचे कारण काय, याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे.” (Maharashtra Politics)
‘एकनाथ शिंदे हेच खरे टायगर’
कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना म्हटले की, “टायगर कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी नेतृत्व उभे केले आणि शिवसेना वाचवली. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक लोक आज त्यांच्यासोबत येत आहेत.” (Maharashtra Politics)

मुंबईतील २५ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा
रामदास कदम यांनी पुढे दावा केला की, ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. “मुंबईतील २५ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. आज त्यांची नावे सांगणार नाही, पण २०२९ पर्यंत अनेक आमदारही उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाहीत,” असे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
संजय राऊतांवरही निशाणा
संजय राऊत यांच्यावर टीका करताना कदम म्हणाले, “त्यांना संसदीय नियम माहिती नाहीत. वेगळ्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते, हे त्यांनी समजून घ्यावे. ते सतत केवळ प्रसिद्धीसाठी बोलत असतात.” (Maharashtra Politics)





