मुंबई – सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बुधवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बांठिया अहवाल मान्य करत राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोटभर पाण्यात बुडून मरावं, असे म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
बावनकुळे म्हणाले, “ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही बऱ्यापैकी जिंकलो आहोत. पण त्यासाठी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं सरकार जावं लागलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळेच ओबीसी आरक्षणाची लढाई शक्य झाली आहे.
राज्यात अद्याप उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं सरकार असतं, तर ही लढाई आम्ही जिंकू शकलो नसतो. ओबीसी समाजाला न्यायच द्यायचा नाही, असं महाविकास आघाडी सरकारनं ठरवलं होतं. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर, पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंबंधित अधिकाऱ्यांशी फडणवीसांनी चर्चा केली, आढावा घेतला, सॉलीसीटर जनरल यांची भेट घेतली, उत्कृष्ट वकील नियुक्त केले, शिंदे फडणवीस सरकार आलं म्हणूनच ओबीसी आरक्षण लागू झालं” असंही बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र एनसीसी चमूने विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवावे – राज्यपाल कोश्यारी
“सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असतं तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर केला नसता. तसाच दाबून ठेवला असता. परिणामी, राज्यात पुढील निवडणुकादेखील ओबीसी आरक्षणाविनाच घ्याव्या लागल्या असत्या. पण शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी बांठिया आयोगाचा २७ टक्के आरक्षणाचा अहवाल स्वीकारला, तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला, उच्चस्तरीय वकील नियुक्त करून न्यायालयात आपली बाजू मांडली, म्हणून आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता घोटभर पाण्यात बुडून मरावं” असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
OBC Reservation : बावनकुळे यांचा आरोप बिनबुडाचा – छगन भुजबळ