Yumnam Khemchand Singh : मणिपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शांतता ही प्राथमिक अट आहे. वांशिक हिंसाचारामुळे होरपळलेल्या राज्यात जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार संवादाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह (Yumnam Khemchand Singh) यांनी मंगळवारी केले. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील चनम सांद्रोक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील महामार्गांवर सर्व समुदायांची सुरक्षित आणि मुक्त ये-जा सुरू व्हावी, यासाठी सरकार आग्रही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी (Yumnam Khemchand Singh) शांततेचे आवाहन केले. गेल्या काही काळापासून मैतेई आणि कुकी समुदायांनी एकमेकांच्या हालचाली रोखण्यासाठी प्रमुख महामार्गांवर नाकेबंदी केली होती, ज्यामुळे राज्याची रसद आणि दळणवळण विस्कळीत झाले होते. शांतता प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या अलीकडील हिंसाचाराचा उल्लेख करताना मुख्यमंत्री भावूक झाले. Yumnam Khemchand Singh ७ एप्रिल रोजी विष्णुपूर जिल्ह्यातील त्रोंग्लाओबी येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका ५ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या ६ महिन्यांच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, “अशा घटना संपूर्ण समाजासाठी क्लेशदायक आहेत. मुख्यमंत्री (Yumnam Khemchand Singh) म्हणून या घटनेने मलाही तितकेच दुःख झाले आहे.” या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. हिंसाचाराची पार्श्वभूमी मणिपूरमध्ये मे २०२३ पासून खोऱ्यातील मैतेई आणि डोंगराळ भागातील कुकी समुदायांमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत किमान २६० लोकांचा बळी गेला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. या प्रदीर्घ अस्थिरतेमुळे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, जी जवळपास एका वर्षानंतर ४ फेब्रुवारी रोजी उठवण्यात आली. आता पुन्हा एकदा लोकनियुक्त सरकार संवादाचा मार्ग अवलंबून राज्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.