Waris Pathan Vs Nitesh Rane | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये सी.आय.व्ही ग्राउंडवर काल (९ ऑक्टो) जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नितेश राणे यांनी अनेकदा कट्टर हिंदुत्त्ववादी भूमिका घेत वादग्रस्त विधाने केली आहेत. यावरूनच या सभेतून वारीस पठाण यांच्यासह माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही भाषणातून भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या भाषणामधून नितेश राणे यांना, “एक नेपाळी म्हणतो की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू. मात्र तू दोन पायांवर येशील तर जाताना स्ट्रेचरवरून जाशील,” असा इशारा पठाण यांनी नितेश राणे यांना दिला. ‘भाजपचे एकच काम आहे, ते म्हणजे द्वेष पसरवणे’ तसेच “आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहोत, तरी देखील आमच्या लोकांना अटक केली जात आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब होईल असे आपल्यालाला का वाटते? विकासावर बोलण्यात यांच्याकडे काहीच नाही. हे सर्व लोक फेल झाले आहेत. भाजपचे एकच काम आहे, ते म्हणजे द्वेष पसरवणे,” असेही पठाण म्हणाले. Waris Pathan Vs Nitesh Rane | यावेळी पठाण यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. “70 वर्ष जे सत्तेत बसले त्यांनीही आमच्यासाठी काही केलं नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकाही मुस्लिम नेत्याला तिकीट दिलं नाही. हे भविष्यात आपल्याला काय देणार?”असा सवाल देखील पठाण यांनी उपस्थित केला. Waris Pathan Vs Nitesh Rane | तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. मंत्री तथा भाजप आमदार नितेश राणे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जहरी टीका केली. यावेळी इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंचा ‘छोटासा चिंटू’तर संग्राम जगताप यांचा चिकनी चमेली उल्लेख करत डिवचलं. “चिकनी चमेली, तू काय चिज आहेस” “सध्या मुस्लिमांना शिविगाळ देण्याची फॅशन आली आहे. सध्या राज्यात कसले कसले लोक तयार झाले आहेत. आधी आपली वेगळी इमेज तयार करण्यासाठी एक छोटासा चिंटू बोलायचा. आता या शहरात एक चिकनी चमेली आली आहे. चिकनी चमेली, तू काय चिज आहेस,” असा टोलाही जलील यांनी लगावला. दरम्यान, अहिल्यानगर शहरात काही दिवसांपूर्वी दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे घडलेल्या या घटनेमुळे हिंसाचार उफाळला होता. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. Waris Pathan Vs Nitesh Rane | हेही वाचा: ट्रम्प यांना आज नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची अपेक्षा? ; नॉर्वेजियन समितीने दिली ‘ही’ माहिती