MNS BJP Alliance : सध्या राज्यात असलेली राजकीय परिस्थिती यामुळे कधी कोणती निवडणूक लागेल हे सांगणं कठीण आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नेत्यांनुसार दोन – दोन गट पडलेले असताना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशात राजकीय वर्तुळात भाजप-मनसेच्या युती होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत मनते नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर आता भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे कारण आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर आता मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहेत. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच आता भाजप मनसे युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या बैठकीबाबत सांगितले की,”आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून फडणवीसांना भेटायचं होतं. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती.’ असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.