Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंनी रामदास आठवलेंची जाहीरपणे मागितली माफी; काय घडले नेमके?

मुंबई : भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. “मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चुक झाली आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
‘मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे’ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमध्ये चांगलं स्थान मिळेल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रिपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजुत काढतील. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाही मुळे मिळालेले नाही असेदेखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.





