झारखंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले रामदास सोरेन कोण ?

झारखंडचे राजकारण तापले आहे. लवकरच माजी मुखमंत्री चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. चंपाई सोरेन यांनी झामुमो सोडल्याने मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत आले आहे. हेमंत सोरेन आता चंपाई सोरेनला पर्याय शोधत आहे. याच क्रमाने त्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आदिवासी नेते रामदास सोरेन यांना मंत्रिपदाची शपथ दिली. रामदास सोरेन यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना चंपाई सोरेन यांच्यासारखीच सर्व खाती दिली जाऊ शकतात. त्यामुळे आता रामदास सोरेन चर्चेत आले आहे.
रामदास सोरेन हे संथाल आदिवासी समाजातील आहेत. रामदास सोरेन हे संथाल आदिवासी समाजातून येतात, ज्यातून चंपाई सोरेन देखील येतात. याशिवाय रामदास सोरेन हे चंपाई यांच्या जवळचे मानले जातात. अशा स्थितीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चंपाई सोरेन यांनी पक्ष सोडल्यापासून हेमंत सोरेन यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
झारखंडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी झामुमो सोडल्याने मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत आले आहे. हेमंत सोरेन आता चंपाई सोरेनला पर्याय शोधत आहे. याच क्रमाने त्यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि आदिवासी नेते रामदास सोरेन यांना मंत्रिपदाची शपथ दिली. रामदास सोरेन यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना चंपाई सोरेन यांच्यासारखीच सर्व खाती दिली जाऊ शकतात.
रामदास सोरेन हे संथाल आदिवासी समाजातील आहेत.
रामदास सोरेन हे संथाल आदिवासी समाजातून येतात, ज्यातून चंपाई सोरेन देखील येतात. याशिवाय रामदास सोरेन हे चंपाई यांच्या जवळचे मानले जातात. अशा स्थितीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चंपाई सोरेन यांनी पक्ष सोडल्यापासून हेमंत सोरेन यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2020 मध्ये हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा रामदास यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी निवडणूक जिंकली. झामुमोचे सरकार स्थापन झाले पण त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले नाही. आता चंपाई सोरेन यांनी पक्ष सोडल्यामुळे रामदास सोरेन यांना अच्छे दिन आले असून त्यांना हेमंत सोरेन सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. आता रामदास सोरेन यांच्यावर कोल्हाण मंडळात जेएमएमला आघाडी देण्याची जबाबदारी असेल कारण चंपाई भाजपमध्ये गेल्याने झामुमोला निश्चितच धक्का बसला आहे.





