Zaheer Khan got angry with Virat Kohli : सध्या भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे नाव खूप चर्चेत आहे. आयपीएलमधील एलएसजी संघाचा मार्गदर्शक असणारा झहीर खान नुकताच वडील झाला आहे. कारण त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेने त्यांच्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आज आपण झहीर खानशी संबंधित एक किस्सा जाणून घेऊया, ज्याच्याबद्दल वेगवान गोलंदाज इशांत शर्माने नुकताच खुलासा केला आहे. तो म्हणाला, झहीर खान रागात विराट कोहलीला म्हणाला होता की तुझ्यामुळे माझं करियर संपलं.
ही गोष्ट २०१४ ची आहे –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इशांत आणि झहीर जिओ सिनेमावर बोलत होते. यावेळी इशांतने सांगितले होते की झहीर खान कसा रागावला आणि विराट कोहलीला फटकारला. यानंतर झहीरनेही आपली बाजू मांडली. ही घटना भारताच्या २०१४ च्या न्यूझीलंड दौऱ्यातील आहे. त्यावेळी ब्रेंडन मॅक्युलमने भारताविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. या सामन्यात विराट कोहलीने मॅक्युलमचा झेल सोडला होता. इशांत शर्माने जिओ सिनेमावर याबद्दल सांगितले होते.
तू माझी कारकीर्द उद्ध्वस्त केलीस – इशांत शर्मा
इशांत शर्मा म्हणाला की, आम्ही न्यूझीलंडमध्ये खेळत होतो. झहीर खानच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने ब्रेंडन मॅक्युलमचा झेल सोडला. यानंतर त्याने जेवणाच्या वेळी झहीरची माफी मागितली. मग झहीर म्हणाला की काही फरक पडत नाही. आपण त्याला आऊट काढू. मॅक्युलम खेळत राहिला आणि चहाच्या वेळी कोहलीने पुन्हा झहीरची माफी मागितली. झहीरने पुन्हा त्याला काळजी करू नको असे सांगितले. पण मॅक्युलम तिसऱ्या दिवसापर्यंत खेळत राहिला. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान, चहाच्या वेळी जेव्हा विराट कोहलीने झहीरची पुन्हा माफी मागितली, तेव्हा त्याला राग आला. झहीरने कोहलीवर संतापला आणि म्हणाला ‘तू माझं करिअर उध्वस्त केलंस.’
हेही वाचा – BCCI Coaching Staff : BCCI चा मोठा निर्णय! भारताच्या कोचिंग स्टाफमधील चौघांची केली हकालपट्टी
झहीर खान काय म्हणाला?
यावर झहीर म्हणाला की, तो असे म्हणाला नव्हता. मी म्हणालो की असे फक्त दोनच खेळाडू आहेत. प्रथम किरण मोरे, ज्याने ग्रॅहम गूचचा झेल सोडला, त्याने ३०० धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आहे, ज्याने एक झेल सोडला आणि कोणीतरी ३०० धावा केल्या. झहीरच्या म्हणण्यानुसार, यानंतर विराटने त्याला असे बोलू नको असे सांगितले. झहीरने सांगितले की कोहलीला हे आवडले नाही. कारण झेल सोडल्यानंतर खूप धावा झाल्या. वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह कसोटीदरम्यान ही घटना घडली. हा मालिकेतील दुसरा कसोटी सामना होता. हा झहीर खानच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला. परंतु, त्याने या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या.