Gunaratna Sadavarte : “एकनाथ शिंदें साहेबांनी मनोज जरांगे पाटील म्हणायची काय गरज होती. ते चुकले”; गुणरत्न सदावर्ते
Gunaratna Sadavarte : या टीकेनंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

Gunratna Sadavarte on Manoj Jarange : पुन्हा मराठा आरक्षणासाठी लढा उभारून आंदोलनाची हाक देणाऱ्या मनोज जरांगेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे डबल गेम करत असल्याचं म्हणतं उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली असल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं.
यावरच न थांबता मनोज जरागेंनी अनेक मंत्र्यांवर घणाघाती टीका केली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. या टीकेनंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
मनोज जरांगे ज्या प्रकारे व्यक्त होतात ते आक्षेपार्ह व्यक्त होणं असून ही त्याच्या बापाची जहागिरीदारी नाही, अशा शब्दांत सदावर्तेंनी सुनावलं. जरांगे त्यांच्या ठेवणीत किंवा त्यांची पिलावळ… आम्ही शिंदे साहेबांची अवहेलना करत नाहीत. उदय माझा भाऊ आहे, असं म्हणत मंत्र्यांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
मनोज जरागेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली होती. यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदेंना थेट सवाल केला. “एकनाथ शिंदे साहेबांनी मनोज जरांगे पाटील म्हणायची काय गरज होती. ये मनोज…. ये मनोज…. अंगातला सिवसैनिक का जागा झाला नव्हता, काल एकनाथ शिंदे चुकले त्यांनी स्पष्टपणे बोलायचा पाहिजे होतं, असं मत व्यक्त केलं. (Gunaratna Sadavarte)
जर आमच्या कोणत्या पुढाऱ्याला काही बोलालं तर सब कुछ छोडो होगा असा थेट इशारा यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंना दिला़. यानंतर आता मनोज जरांगे गुणरत्न सदावर्तेंच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे? (Gunaratna Sadavarte)
“एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला. उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली आहे. मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार… मी मिंधा नाही, जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही. बावनकुळे फडणवीस यांचा मालक झाला का?” असं म्हटलं होतं.
Patna : भीषण अपघातानंतर मोठा गोंधळ ; वाहनांची नासधूस अन् पोलिसांवरही दगडफेक





