पृथ्वीवरील ऑक्सिजन संपले तर काय होईल? वाचा सविस्तर…

Oxygen | पृथ्वीवरील ऑक्सिजन कधी ना कधीतरी संपुष्टात येणार, ही एक वस्तुस्थिती आहे. अर्थात हे आपल्या आयुष्यात घडणार नाही हे निश्चित. हे केव्हा घडेल आणि का घडेल त्यावेळी देखील मानवी जीव आणि अन्य प्राणी जीव वनस्पती ऑक्सिजन शिवाय जगू शकतील का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
जेव्हा पृथ्वी तयार होत गेली तेव्हा पृथ्वीवर ऑक्सिजन नव्हता किंवा पृथ्वीवर जीवन देखील नव्हते. त्यावेळच्या वातावरणात अनेक प्रकारचे वायू होते. त्यामध्ये मिथेन आणि अमोनिया सारखे वायू देखील होते. नंतरच्या काळात फोटोसिंथेसिस प्रक्रियेतून ऑक्सिजन तयार झाला. सुरुवातीला तो अगदी अल्प स्वरूपात होता. पृथ्वीच्या सुरुवातीच्या दिवसात तो अतिशय धोकादायक वाटावा असा होता. त्यामुळेच ऑक्सिजन कॅटॅस्ट्रोफ आणि ग्रेट ऑक्सिडेशन सारख्या घटना घडून आल्या.
त्यावरूनच स्पष्ट होते, की त्या काळात ऑक्सिजन अतिशय धोकादायक वाटावा असाच होता. हे सगळे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी घडून येत होते. त्यानंतर फोटोसिंथेसिस प्रक्रियाद्वारे जिवाणूंनी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करण्यास सुरुवात केली आणि तो वातावरणात साठत राहिला त्याचा भयंकर असा परिणाम झाला की अॅनाएरोबिक जीवसृष्टी नष्ट झाली.
अॅनाएरोबिक म्हणजे ऑक्सिजनशिवाय जगू शकणारे जीव. त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नव्हती. उलट त्यांच्यासाठी ऑक्सिजन धोकादायक होता. सुमारे अडीच अब्ज वर्षांच्या कालावधीत सूर्य अधिकाधिक प्रकाशमान होत गेला सूर्याची निर्मिती सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली असे सांगण्यात येते आणि त्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती होऊन नंतरच्या काळात सूर्य अधिकाधिक प्रकाशमान झाला. या कालावधीत सूर्य सुमारे 30 टक्के अधिक प्रकाशमान झाला.
या घडामोडीतून पृथ्वीवर पुढील एक अब्ज वर्षात दहा टक्के प्रकाश जास्त येऊ लागला आणि तो पृथ्वीवरील जीवजंतूंसाठी असह्य असा होता. त्यामुळेच कदाचित त्या काळात पृथ्वी शुक्र ग्रहांप्रमाणे कोरडी आणि जीवविहीन ग्रह ठरली होती. कुठल्याही प्रकारचे जीवजंतू नसल्यामुळे स्वाभाविकपणे पृथ्वीवर ऑक्सिजन नव्हता. त्यामुळेच जेव्हा सूर्याचा चमकदारपणा वाढेल तेव्हा त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येईल. कारण अशा स्थितीमध्ये पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती थांबेल.
या सगळ्या घडामोडींचा सगळ्यात पहिला परिणाम होईल. तो वनस्पतींवर नव्हे तर पृथ्वीवरील खडकांवर होणार आहे. खडकांमध्ये गुंतागुंतीची अशी कार्बोनेट खनिजे आणि वातावरण यांच्यातील कार्बोनेट सिलिकेट चक्र चालू असते. या खनिजांमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड असतो.
सूर्यप्रकाशात वाढ झाल्यास हे खडक वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याचे काम करत राहतील. मात्र त्यांच्याकडून परत कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात पाठवला जाणार नाही. म्हणजेच या कार्बोनेट सिलिकेट चक्रात व्यत्यय आला तर वनस्पतींसाठी ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्यासाठी कार्बन डाय-ऑक्साइड कमी प्रमाणात उपलब्ध असेल. म्हणजेच कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण कमी झाले तरी देखील त्यातून जागतिक हवामान बदलाची लक्षणे दिसू शकतात.
मात्र त्याचा परिणाम पृथ्वीवरील ऑक्सिजनच्या निर्मितीत आणि फोटोसिंथेसिस प्रक्रियेवर खूपच अल्प परिणाम करणारा असतो. अशावेळी वनस्पती क्लोरोफिल या नैसर्गिक घटकाचे उत्पादन करतील त्याद्वारे वनस्पतींना सूर्यप्रकाशापासून ऊर्जा शोषून घेणे शक्य होईल. अर्थात या काळात अतिशय तीव्र स्वरूपाचा प्रकाश पृथ्वीवर येऊ शकणार असल्याने पाने फ्री रॅडिकल्स देखील तयार करू शकतात.
पृथ्वीवर तीव्र स्वरूपाचा प्रकाश येणे म्हणजेच वनस्पती नष्ट होणे आणि अशा परिस्थितीत पृथ्वीवरील जंगले टिकून राहणे अशक्य आहे अशा परिस्थितीत अंतिमतः पृथ्वीला वाळवंटाचे स्वरूप येईल. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया केवळ वनस्पतीशी निगडित नसून त्याचा परिणाम पृथ्वीवरील समुद्रावरही होणार आहे. अर्थात जमिनीवर जितक्या वेगाने फोटोसिंथेसिस प्रक्रिया होईल तितक्या वेगाने समुद्रावर होणार नाही. त्यासाठी जास्त कालावधी लागेल.
पृथ्वीवरील सुमारे 50 ते 80% ऑक्सिजनची निर्मिती सागरापासून होते. जेव्हा सूर्याचा अति तीव्र प्रकाश पृथ्वीवर पोहोचू लागेल तेव्हा वनस्पतींप्रमाणेच त्याचा परिणाम पृथ्वीवरील जलसृष्टीवर आणि जलसाठ्यांवर होणार आहे. पृथ्वीवरील सर्व पाणी पाण्याची हळूहळू वाफ होऊन ही वाफ पृथ्वीच्या वातावरणात न राहता ती अंतराळात जाईल.
जेव्हा सूर्याकडून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट करण्याचे काम सुरू होईल, त्यावेळेला अर्थातच पृथ्वीवर मनुष्य अस्तित्वात असण्याची शक्यता खूपच कमी आहे. इतिहासात असे दिसून येते, की अनेक सस्तन प्राण्यांच्या जाती लाखो वर्षांपूर्वी नष्ट झाल्या. त्यामुळेच अपवाद म्हणून मनुष्य जीवन आणखी अब्ज वर्षे पृथ्वीवर टिकून राहील ही काहीशी अव्यवहार्य गोष्ट आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.
परंतु त्यावेळी देखील मनुष्य जीव टिकून राहिला तर पृथ्वीवरील वातावरणातील घुसमट व ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन मनुष्य तोपर्यंत अन्य ग्रहांवर प्रवास करून त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू शकतो. यावर आणखी एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे सूर्यापासून आपली पृथ्वी आणखी लांब जाणे.
अर्थात हे सगळे मूर्खपणाचे वाटत असले, तरीसुद्धा शास्त्रज्ञांनी या गृहितकाचाही विचार केलेला आहे. त्यासाठी अंतराळातील अन्य छोट्या वस्तूने पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाच्या वापर करून वारंवार धडका देणे आवश्यक आहे. त्यामुळे पृथ्वीची फिरण्याची कक्षा हळूहळू बदलू लागेल. अर्थात या सगळ्यासाठी अब्जावधी वर्षे लागू शकतात.
जेव्हा सूर्याकडून पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल. त्याचवेळी मंगळावर जीवसृष्टीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली असेल असे शास्त्रज्ञांना वाटते. अर्थात त्यावेळी मंगळावर अतिशय थंड वातावरण असेल म्हणजेच पृथ्वीवर शेवटचे हिमयुग जसे होते, तशी स्थिती मंगळावर असेल. मात्र मनुष्य प्राणी त्या ठिकाणी तग धरू शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते.




