मुंबई – अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला.
सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातिवाद निर्माण करणार्या सरकारला खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे, असा सवाल त्यांनी केला.
#MahaBudget2003 : बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प – कृषीमंत्री सत्तार
ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असून जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.