weather update : निसर्गाचं नाट्य रंगात… देशात वादळ, पाऊस आणि गारपिटीची मालिका सुरूच, हवामान खात्याचा इशारा !

weather update : देशात उन्हाळा सुरू होत असताना, त्यासोबतच हवामानातील वेगवेगळे बदलही दिसून येत आहेत. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांमुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तर काही ठिकाणी धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी येत आहेत.
या हंगामात वादळ आणि पावसाने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. हवामानातील कोणताही बदल गेल्या ६ महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेडू शकतो. त्यामुळे बळीराजा देखील चिंतेत असल्याचं दिसून येत.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, देशात वादळ, पाऊस आणि गारपिटीची मालिका सुरूच राहणार आहे. यामुळे लोकांना अधूनमधून उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल.
या महिन्याच्या अखेरीस एकूण कमाल तापमान ४५ अंशांच्या पुढे जाऊ शकते. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, १५ एप्रिलनंतर गुजरात आणि वायव्य भारतात तीव्र उष्णतेचा काळ सुरू होऊ शकतो.
१५ एप्रिलपासून हवामान बदलेल :
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, झारखंडमध्ये १५ एप्रिलपासून पाऊस आणि गारपिटीचा कालावधी सुरू होऊ शकतो. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्येही वादळ किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू राहू शकतो.
हवामान अपडेट :
दिल्ली-एनसीआरबद्दल बोलायचे झाले तर, १३ ते १५ एप्रिलपर्यंत आकाश निरभ्र राहील. या काळात कमाल तापमान ४० अंशांपर्यंत जाऊ शकते. १५ एप्रिलपासून तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. या काळात अनेक भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण होईल.
पंजाबमध्ये उष्णतेची लाट :
गुजरात, पश्चिम राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्येही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अनेक ठिकाणी धुळीची वादळे येतील, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढेल. यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळू शकेल. पश्चिम राजस्थानमध्ये परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. १५ एप्रिलनंतर तिथे तापमान ६ अंशांपर्यंत वाढू शकते.





