नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीचा, आणि सशस्त्र दलांचा “अपमान” केला म्हणून सर्वच गांधी आडनावांना दोष देता येणार नाही अशी उपरोधिक टिप्पणी केंद्री मंत्री किरेन रिजीजू यांनी केली आहे.
एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत अतिशय अपमानास्पद टिप्पणी केली असून त्यांनी संपूर्ण ओबीसी समुदायाला बदनाम केले आहे. धक्कादायक म्हणजे, काही कॉंग्रेस नेते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.
BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांना काल एका बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे त्यावर अजूनही विविध घटकांकडून प्रतिक्रीया येत आहेत.