WCL 2024 (India Champions vs Pakistan Champions Final) : शनिवारी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ज्याप्रमाणे टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले, त्याचप्रमाणे यास्पर्धेतही भारताने पाकिस्तानवर आपले वर्चस्व कायम राखले आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 जिंकली.
अंबाती रायडूने इंडिया चॅम्पियन्ससाठी शानदार खेळी खेळली आणि 30 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, पाकिस्तान चॅम्पियन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या. या काळात भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारत चॅम्पियन्सने 19.1 षटकांत 5 गडी गमावत 159 धावा करून सहज विजय मिळवला.
India Champions pose with the trophy after beating Pakistan Champions in the final of the World Championship of Legends in Birmingham https://t.co/agcvbhIenz pic.twitter.com/sqhGrXhJNd
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 14, 2024
इंडिया चॅम्पियन्सने अशी रचली विजयाची कहाणी…
लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया चॅम्पियन्सची सुरुवात चांगली झाली. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली, जी तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपली, जेव्हा उथप्पा 8 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सुरेश रैना केवळ 04 (2 चेंडू) धावा करून बाद झाला. यानंतर अंबाती रायडू आणि गुरकीरत सिंग मान यांनी काही काळ डाव संभाळला आणि त्यानंतर 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भारतीय चॅम्पियन्सला अंबाती रायडूच्या रूपाने तिसरा धक्का बसला. रायुडूने 30 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
त्यानंतर 13व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गुरकीरत सिंगच्या रूपाने संघाला चौथा धक्का बसला. गुरकीरतने 33 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. त्यानंतर संघाला 150 धावांच्या धावसंख्येवर पाचवा धक्का 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या युसूफ पठाणच्या रूपाने बसला. युसूफ पठाणने 16 चेंडूत 1 चौकार अन् 3 षटकारासह 30 धावांची खेळी केली. त्यानंतर येथून कर्णधार युवराज सिंगने नाबाद 15* आणि इरफान पठाणने नाबाद 5* धावांची खेळी करत भारताला विजयाची रेषा ओलांडून दिली.