वायनाड भूस्खलनातील मृतांचा आकडा 151 वर ; मुसळधार पावसाचा पुन्हा इशारा

Wayanad Landslides । केरळच्या वायनाडमध्ये काल झालेल्या भूस्खलनाने मोठी हानी केली आहे. आतापर्यंत 151 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक लोक बेपत्ता झाल्याचे म्हटले जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येतंय. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे वायनाडमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज काही क्षणात वायनाडला पोहोचणार आहेत. त्यांच्याशिवाय केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस हेही वायनाडला पोहोचले आहेत. दोन्ही लोक वायनाड भूस्खलनानंतर सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतील.
भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली Wayanad Landslides ।
वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी चुरलमालामध्ये बचावकार्य सुरू केले आहे. येथे लष्कराच्या चार तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमही लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.
मुसळधार पावसाचा इशारा Wayanad Landslides ।
येत्या तीन तासांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विभागाने केरळमधील पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वायनाड, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यातही येत्या तीन तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे.




