Accident News : स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! ट्रॅव्हल्स बसने 3 विद्यार्थिनींना चिरडलं, तिघींचाही जागीच मृत्यू
Accident News : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात. भरधाव ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत ३ अल्पवयीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला.

Accident News : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सुरू असतानाच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मेडिकल कॉलेजजवळ भरधाव ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. (Accident News)
दुचाकीला मागून जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनानिमित्त तिन्ही मुली दुचाकीवरून शहरात फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. मेडिकल कॉलेजजवळून जात असताना मागून आलेल्या ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (Accident News)
धडक एवढी भीषण होती की तिन्ही मुली बसखाली आल्या. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. (Accident News)
मृत विद्यार्थिनींची नावे
या दुर्घटनेत समृद्धी रुपक धामसे (15), आरुही राजू चवरे (17) आणि मिसबा जावेद शेख (17) यांचा मृत्यू झाला. तिघीही अल्पवयीन असल्याने या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)
हिंगणघाटमध्ये शोककळा
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तीन निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने हिंगणघाट शहरात शोककळा पसरली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (Accident News)
घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांचे पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला आणि बसचालकाची भूमिका काय होती, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Accident News)
Accident news : लग्नाला जाताना काळाचा घाला.! टेंपो कालव्यात पडून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू






