Accident News : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तीन शाळकरी मुलींचा दुर्देवी अंत
Accident News : अपघातात दुचाकीवरील तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॅाक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.

Accident News : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाट शहरात दुर्देवी घटना घडली आहे. आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात तीन शाळकरी मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज १५ ऑगस्ट रोजी तिन्ही शाळकरी मुली दुचाकीवरून जात होत्या. याचवेळी आंबेडकर शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात खूप भीषण होता. अपघातात दुचाकीवरील तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॅाक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.
समृद्धी रुपक धामसे (वय १५, संत गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट), आरुही राजू चवरे (वय १७) आणि मिसबा जावेद शेख (वय १७, संत चोखोबा वॉर्ड) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलींचे नावे आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शाळकरी मुलींचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





