शांतता राखण्याचे आवाहन –
\nया घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील काही आक्षेपार्ह होर्डिंग्ज काढण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. अफवांमुळे शहरातील बाजारपेठेतील दुकाने बंद राहिली. उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य –
\nया प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या घटनेमागे कोणताही कट आहे का, याचा तपास करावा लागेल. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हे पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीप्रमाणे ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत आहे का, याचीही तपासणी करू. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण अशा प्रकारे तणाव निर्माण करणे चुकीचे आहे.” दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मंगळवारी अहिल्यानगरात पूर्वनियोजित सभा आहे. यामुळे शहरातील तणावपूर्ण वातावरणात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.