“आता ‘त्यांना’ फ्री हॅन्ड काम करण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही” ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची फडणवीसांवर स्तुतीसुमने

Vijay Vadettiwar on Devendra Fadnavis । राज्यातील सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे समोर येत आहे. कारण काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच मुख्यमंत्री पदाचा शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसमधील बड्या नेत्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे राजकी वर्तुळातून नव्या चर्चांना उधाण आले आहे.
विजय वडेट्टीवारांकडून स्तुतीसुमने Vijay Vadettiwar on Devendra Fadnavis ।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर प्रतिक्रिया देताना,”देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत हा विदर्भाच्या दृष्टीने आनंद आहे, विदर्भाचा बॅकलॉग गेला सात आठ वर्षात पूर्ण झाला नाही, आता अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट जा कुबड्या आहेत त्या फडणवीस यांच्यावर अवलंबून आहे, असा टोला ही त्यांनी महायुतीमधील भाजपाच्या दोन मित्र पक्षांची नावं न घेता लगावला.
तसेच पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी,”आता त्यांना फ्री हॅन्ड काम करण्यासाठी कोणी थांबऊ शकत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलाग, बेरोजगारी शेतकरी प्रश्न या सगळ्या पातळीवर विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूयात,” असेही त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुसरी अपेक्षा आहे ते बदला घेण्याचे राजकारण करतात, असं राजकारण ते आता करणार नाही अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हरकत नाही, असा चिमटा वडेट्टीवार यांनी यावेळी काढला. कारण राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक कोणी कोणाचेही वैरी नाही, त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी काही भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते छाप पडतील अशी अपेक्षा आहे, असे कौतुक त्यांनी केले.
‘त्यांची’ उपयुक्तता संपली Vijay Vadettiwar on Devendra Fadnavis ।
पुढेच त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी बोलताना,”अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळी चेहरा पडलेला दिसला, असे टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. 2029 मध्ये येथे दोन्ही चेहरे उपमुख्यमंत्री पदाचे अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेत मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादाने राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही ते विरोध ही करणार नाहीत, ” अशी जहरी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा
भाजपकडे मंत्रिपदाच्या मागणीवर मनीषा कायंदे यांचे सूचक वक्तव्य ; म्हणाल्या ,”आम्ही तो विषय…”





