Monsoon Alert : पुढच्या 24 तासांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार; ‘या’ 17 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास २० दिवस उलटले तरीही (Monsoon Alert) पावसाने ओढ दिल्यामुळे संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या २४ तासांत हवामानाने कूस बदलली असून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे.

Monsoon Alert : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास २० दिवस उलटले तरीही (Monsoon Alert) पावसाने ओढ दिल्यामुळे संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या २४ तासांत हवामानाने कूस बदलली असून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान विभागाने २२ जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसार मंगळवारपासूनच राज्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू झाली आहे.
हवामान विभागाच्या मते, मान्सूनची ही अनुकूल स्थिती येत्या ३० जूनपर्यंत अशीच कायम (Monsoon Alert) राहणार आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही आपला नवीन अंदाज व्यक्त केला असून येत्या १० जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होईल, असे स्पष्ट केले आहे.
पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार, महाराष्ट्रात पावसाचा जोर दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे. विशेषतः २४ जून, २५ जून आणि २६ जून या दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात पावसाचा जोर अत्यंत अधिक असेल.
पुढील काही तासांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नसून, राज्यातील सर्वच भागांतील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुखरूप पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हा पाऊस वेगवेगळ्या दिवशी राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी (Monsoon Alert) लावणार आहे. आज मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक तसेच रत्नागिरी ते रायगड या किनारपट्टीच्या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील या दमदार हजेरीनंतर हा पाऊस हळूहळू मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, खानदेश आणि मराठवाडा अशा सर्वच प्रांतांना हा पाऊस चांगलाच भिजवून चिंब करणार आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे राज्यातील बळीराजाला खूप मोठा दिलासा मिळाला असून, आता रखडलेल्या पेरण्यांच्या कामांना कमालीचा वेग येणार आहे.






