Vietnam Boat Accident: “माझा मित्र बोटीत अडकला होता, पण…” ; व्हिएतनाम दुर्घटनेतील पिडीताने सांगितला घडलेला प्रसंग
Vietnam Boat Accident: व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ काल एक बोट उलटली. या अपघातात आतापर्यंत पंधरा भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ काल एक बोट उलटली. या अपघातात आतापर्यंत पंधरा भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत ३६ जण होते. ३२ भारतीय पर्यटक, तीन कर्मचारी आणि एक मदतनीस. होन मे रुट न्गोई बेटावरून आन थोई बंदराकडे निघाल्यानंतर लगेचच, जोरदार लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट उलटली.
या अपघातातून वाचलेल्यांपैकी एक, निर्मल कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या या घटनेबद्दल सांगितले. त्यांनी याविषयी बोलताना, “ही एक बंदिस्त स्पीडबोट होती, ज्यात ३२ प्रवासी होते आणि निघाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांतच ती उलटली.” असे म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “पुढच्या सीटवरील प्रवासी खिडकीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर मागच्या सीटवरील प्रवासी तितके नशीबवान नव्हते.” ते म्हणाले, “आमच्यापैकी सुमारे २० जणांनी पुढच्या खिडकीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.” मागच्या सीटवर बसलेले पंधरा जण बोटीत अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला.
कुमार यांनी सांगितले की, पलानी याठिकाणी त्यांचे जवळचे मित्र मुरुगा प्रभू यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. प्रभू यांनी ज्या खिडकीचा वापर केला होता, त्याच खिडकीतून त्यांना बाहेर काढण्याचा कुमार यांनी प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले.
कुमार म्हणाले , “आम्ही मित्र आहोत. मी सुद्धा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो बाहेर येऊ शकला नाही. तो तिथे अडकला होता.” कुमारने सांगितले की, स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी त्याच्याशी संपर्क साधला होता, मात्र त्यावेळी दूतावासाने त्याच्याशी थेट संवाद साधला नव्हता.
तो म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, दूतावासाने आम्हाला अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण स्थानिक पोलीस आले असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.”
कुमारने पुष्टी केली की, लावा मोबाईल्सने आयोजित केलेल्या एका सहलीचा भाग म्हणून हा गट एकत्र प्रवास करत होता. सूत्रांनुसार, या सहलीवर दक्षिण भारतातील एकूण ११० लावा वितरक आणि कर्मचारी होते.
लावा मोबाईल्सने एक निवेदन जारी Vietnam Boat Accident:
लावा मोबाईल्सने सोशल मीडियावर एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे काही टीम सदस्य आणि चॅनल पार्टनर बोटीवर होते. कंपनीने सांगितले, “आमच्या लोकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आम्ही व्हिएतनाममधील भारतीय दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. भारत आणि व्हिएतनाममधील आमचे पथक कुटुंबियांच्या सतत संपर्कात असून सर्वतोपरी मदत करत आहेत.”
त्यांनी असेही सांगितले की, भारतात परतण्याचे विमान दुसऱ्या दिवशीचे नियोजित होते, परंतु आता हा गट घटनेनंतरच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी तिथेच थांबणार आहे. ते म्हणाले, “आमची परतीची तिकिटे उद्याची होती, पण या घटनेनंतर ते काय करतात हे पाहण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. आम्हाला आमच्या मित्राला घरी परत आणायचे आहे.”
शनिवारी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्याने किमान १५ भारतीयांचा (१३ पुरुष आणि २ महिला) मृत्यू झाला. एकवीस जणांना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाने बाधित लोकांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी १:०० वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता) घडली.
भारतीय दूतावासाने बचावकार्य सुरू
याबाबत वृत्त देताना दूतावासाने लिहिले, “एका दुःखद घटनेत, व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली आहे. घटनेचा संपूर्ण तपशील गोळा केला जात असून, स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचावकार्य केले जात आहे.”
भारतीय राजदूत, दूतावासाच्या अधिकाऱ्यांसह, दूतावासाच्या मदतीवर देखरेख ठेवण्यासाठी, व्हिएतनामी अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी आणि बाधित भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी फु क्वोक बेटाकडे रवाना होत आहेत.
पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “व्हिएतनाममधील फु क्वोकजवळ भारतीय नागरिकांच्या बोटीचा अपघात झाल्याची दुःखद बातमी ऐकून खूप दुःख झाले. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. जखमी वाचलेल्यांच्या शीघ्र आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. आमचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहेत. आमचे अधिकारी व्हिएतनामी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत.”
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला Vietnam Boat Accident:
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला आवाहन केले आहे की, त्यांनी व्हिएतनामी अधिकाऱ्यांसोबत मिळून सुरू असलेल्या बचाव कार्याला पाठिंबा देण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना सर्व आवश्यक मदत पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
सोशल मीडिया वरील एका निवेदनात ते म्हणाले, “ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत.” जे अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांची वाट पाहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसोबतही माझ्या संवेदना आहेत.”
व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले
व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन्ह हुन यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याला गती देण्यास, जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यास आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले आहे.
मुंबईतील व्हिएतनामच्या महावाणिज्य दूतावासाने एक निवेदन जारी करून अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि या कठीण काळात पीडित कुटुंबांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ओळखण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.






