Vande Mataram – केंद्र सरकारने वंदे मातरमला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ समान दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात असून यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. दरम्यान, जर एखाद्या कार्यक्रमात वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत दोन्ही सादर करायचे असतील, तर आधी वंदे मातरम् आणि त्यानंतर राष्ट्रगीत गायले जाईल. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम्वर आता तेच नियम आणि निर्बंध लागू होतील, जे सध्या राष्ट्रगीतावर लागू आहेत. म्हणजेच, त्याचा अपमान केल्यास किंवा त्याच्या गायनात अडथळा आणल्यास शिक्षा होईल. modi सध्या राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि राष्ट्रगीताचा अपमान केल्यास तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे आणि आता वंदे मातरमचाही यात समावेश केला जाईल. हा बदल वंदे मातरम्ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण्यात आला आहे. यासाठी कायद्याच्या कलम ३ मध्ये सुधारणा केली जाईल. या कलमानुसार, जर एखादी व्यक्ती जाणूनबुजून राष्ट्रगीत गाण्यात अडथळा आणत असेल किंवा त्याला थांबवत असेल, तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा गुन्हा केल्यास किमान एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. केंद्र सरकारने बुधवारी भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम्च्या गायनासाठी अधिकृत प्रोटोकॉलसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वंदे मातरमची संपूर्ण अधिकृत आवृत्ती, ज्यात सहा श्लोक आहेत आणि ज्याचा कालावधी अंदाजे ३ मिनिटे आणि १० सेकंद आहे, प्रमुख शासकीय समारंभांमध्ये सादर किंवा वाजवली जावी. यामध्ये राष्ट्रध्वज फडकवणे, राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये औपचारिक आगमन आणि प्रस्थान समारंभ आणि अशा समारंभांमध्ये त्यांच्या नियोजित भाषणांपूर्वी आणि नंतरचे कार्यक्रम समाविष्ट आहेत.