Kerala Name Change: केंद्र सरकारने केरळ राज्याचे नाव अधिकृतरित्या ‘केरळम’ (Keralam) असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केरळ विधानसभेने हा प्रस्ताव सर्वानुमते पारित केला होता, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले. राज्य सरकारचे म्हणणे आहे की ‘केरळम’ हे या प्रदेशाचे मूळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाव आहे. ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय सोयीसाठी ते बदलून ‘केरळ’ असे करण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की ‘केरळम’ हे नाव मल्याळम भाषा आणि परंपरांशी अधिक जवळचे असून ब्रिटिशकालीन बदल आता दुरुस्त केले जात आहेत. विशेष म्हणजे, या मुद्द्यावर सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी भाजप एकमतावर आले आहेत. केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयाचे स्वागत केले. नाव बदलण्याची प्रक्रिया काय असते? कोणत्याही राज्याचे नाव बदलण्यासाठी आधी विधानसभेत प्रस्ताव पारित करावा लागतो. त्यानंतर तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो. मंत्रिमंडळ आणि संसदेच्या मंजुरीनंतर संविधान दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले जाते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच नाव अधिकृतरित्या बदलते. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून संसदेतील प्रक्रिया अद्याप बाकी आहे. हेही वाचा – Samsung Galaxy S26 Ultra उद्या भारतात लॉन्च होणार; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स