अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त तर ‘या’ गोष्टी झाल्या महाग

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संपूर्ण देशाचे बजेट सादर केले. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत.या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार? तर कोणत्या गोष्टी महागणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला असणार. तर आज आपण अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याबद्दल जाणून घेऊया…
‘या’ गोष्टी होणार स्वस्त
सोन्यांसह मोबाईल, चार्जर,इलेक्ट्रिक वाहने, सोलार, मासे अन्न, चामड्याच्या वस्तू, रासायनिक पेट्रोकेमिकल, पीव्हीसी फ्लेक्स बॅनर अशा अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. सीतारामण यांनी मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली. सोने आणि चांदीवरील सीमाशुल्कात 6 टक्क्यांची तर प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात 6.4 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे हे दागिनेही स्वस्त झाले आहेत. तसेच कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ही औषधेदेखील स्वस्त होणार आहेत.
‘या’ गोष्टी झाल्या महाग
टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत, त्यावरील कस्टम ड्युटी 15% करण्यात आली आहे.प्लास्टिक महाग होणार आहे. टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्टॉक मार्केटमधून इन्कम होणाऱ्यांना वेगळा टॅक्स भरावा लागणार आहे. त्यावरील करदेखील वाढवण्यात आला आहे.





