Udhayanidhi stalin : “राज्यातली माझे प्रत्येक आई आणि बहिणी…”, सुटकेनंतर उदयनिधी यांची पहिली प्रतिक्रिया
Udhayanidhi stalin : तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना मंगळवारी पोलीस कोठडीत घेण्यात आले आणि त्याच दिवशी त्यांची सुटका करण्यात आली.

Udhayanidhi stalin : तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना मंगळवारी पोलीस कोठडीत घेण्यात आले आणि त्याच दिवशी त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर त्यांनी आपल्या वडिलांची भेट घेतली, जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
मंगळवारी पोलीस कोठडीतून सुटका झाल्यानंतर, आपल्यासोबत दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “आम्हाला ३,००० पोलिसांच्या संरक्षणात चेन्नईहून तंजावरला ४०० किलोमीटर रस्त्याने नेण्यात आले. आमच्यासोबत योग्य वागणूक दिली गेली नाही.”
अभिनेत्री त्रिशाबद्दल द्व्यर्थी वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनिधी यांना मंगळवारी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना तंजावरला नेण्यात आले, जिथे गुन्हा दाखल करण्यात आला.
विमानतळावर पत्रकारांशी बोलताना उदयनिधी यांनी हे आरोप “खोटे” असल्याचे सांगत फेटाळून लावले आणि तामिळनाडूसाठी कावेरीचे पाणी सोडण्याची मागणी करणारे “एकतर्फी विधान” केल्याचे म्हटले.
விவசாயிகளின் துயர் துடைக்க வக்கற்ற #SofaModel அரசு, பிரச்சினைகளை திசைதிருப்புவதற்காக என்னை கைது செய்திருக்கிறது.
தஞ்சை ஆர்ப்பாட்டத்தில் தேவையற்ற வார்த்தைகளை நான் பயன்படுத்தியதாக ஆளுங்கட்சியின் Abusive warriors-ஐ வைத்து என் மீது அவதூறு பரப்பினார்கள்.
பொய் வழக்குகளைப்பதிவுச்… pic.twitter.com/5KroOiDwp2
— Udhay (@Udhaystalin) August 4, 2026
खोटे आरोप Udhayanidhi stalin :
उदयनिधी म्हणाले, “मी काहीतरी अनुचित बोललो होतो असा दावा करत, माझ्या भाषणात फेरफार करून काही भाग जोडण्यात आले.” काही लोकांनी माझ्यावर द्विअर्थी बोलण्याचा आरोप केला आहे. मी एकतर्फीच बोललो की, “शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे.”
प्रत्येक आई आणि बहीण माझ्या कुटुंबाचा भाग Udhayanidhi stalin :
ते म्हणाले, “महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मी तामिळनाडूतील प्रत्येक आई आणि बहिणीला माझ्या कुटुंबाचा भाग मानतो.” उदयनिधी यांनी नाराजी व्यक्त केली की, काही सहकारी राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भाषणाचा संदर्भ न समजता त्यांच्यावर टीका केली. दुटप्पीपणाचा आरोप फेटाळत ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कावेरीचे पाणी सोडण्याची मागणी करताना ते एकतर्फीच बोलले होते.”
त्यांनी तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारला ‘सर्कस कॅम्प’ संबोधून त्यांच्यावर निशाणा साधला आणि खोट्या खटल्यांना आपण घाबरणार नाही असे सांगितले. त्यांनी असाही आरोप केला की, सरकारने त्यांना दहशतवाद्यासारखी वागणूक दिली आणि रस्त्याने तंजावरला पोहोचवले.




