Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड; २६ वर्षात ५ बड्या नेत्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ
Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केवळ मुंबईतच नव्हे, तर पुण्याच्या शिवसेना संघटनेला कधीही भरून न निघणारे मोठे भगदाड पडले आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुण्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, गेल्या २६ वर्षांत पुण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संपर्कप्रमुखांपैकी तब्बल पाच जणांनी ठाकरे यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
सन २००० ते २०२६ या कालावधीत पुण्यासाठी शिवसेनेकडून एकूण नऊ संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी चार नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर एक नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये दाखल झाले आहेत. (Maharashtra Politics)
२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरुवातीला रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, डॉ. नीलम गोऱ्हे, बाळा कदम आणि सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे होते. मात्र, कालांतराने अनेकांनी आपली राजकीय भूमिका बदलली. सर्वप्रथम गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि आता सचिन अहिर यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरल्याने पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
गेली चार वर्षे सचिन अहिर यांच्याकडे पुण्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी होती. त्यांच्या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासमोर नवे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Politics)
पुण्याचे संपर्कप्रमुख आणि त्यांचा कार्यकाळ
रवींद्र मिर्लेकर – २००० ते २००६
अरविंद सावंत – २००७ ते २००९
डॉ. नीलम गोऱ्हे – २००९ ते २०१२
गजानन कीर्तीकर – २०१२ ते २०१५
डॉ. अमोल कोल्हे – २०१६ ते २०१९
उदय सामंत – २०१९ ते २०२०
बाळा कदम – २०२० ते २०२१
सचिन अहिर – २०२२ ते २०२६
सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर पुण्यातील शिवसेनेच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात त्याचे परिणाम स्थानिक तसेच राज्याच्या राजकारणावरही दिसू शकतात. (Maharashtra Politics)






