Uddhav Thackeray । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस्वी यादव मासे खात असल्याच्या व्हिडिओवरून हल्लाबोल केला आहे. पीएम मोदी म्हणाले होते,‘नवरात्रीत हा व्हिडिओ दाखवून तुम्ही कोणाला खुश करत आहात? असाही प्रश्न विचारला होता.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की होते, ‘काही लोकांना जनभावनांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते.’ असं म्हणत मोदींनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान आज सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या टीकेवर प्रतिउत्तर देण्यात आले आहे. ‘मुघल’ मातीचा गुण! मटण, कारले वगैरे… अशा शीर्षकाखाली सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या टीकेवर प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
काय आहे सामनाच्या अग्रलेख
आता म्हणतात, इंडिया आघाडीचे लोक मुघल विचारांचे आहेत. हे लोक श्रावणात मटण वगैरे खातात. पंतप्रधान पदावरील व्यक्ती प्रचारात मटण, कारले वगैरे विषय आणत आहे. याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत मोदी यांच्याकडून काहीच भरीव कार्य घडलेले नाही. मोदी यांचा निवडणूक प्रचार हा विरोधकांवर चिखलफेक आहे. कार्यवाहक पंतप्रधान यांना संस्कार नव्हतेच, पण त्यांनी बोलताना ताळतंत्रही सोडले. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. मुघल साम्राज्याच्या बादशहाने जन्म घेण्यासाठी मोदींची जमीन निवडली. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचा कारभार हा मुघल सल्तनतीपेक्षा कमी नाही. मातीचा गुण, दुसरे काय!
कार्यवाहक पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा स्तर भलताच खाली आणला. अर्थात हे भाजपच्या संस्कृतीस धरूनच आहे. राजकारण असो की व्यक्तिगत जीवन, शेवटी संस्कार महत्त्वाचे ठरतात. एकदा नारदमुनी रस्त्यावरून जात असताना त्यांना एक डुक्कर चिखलात लोळत असताना दिसले. नारदमुनींच्या मनात त्याच्याविषयी दयाभाव निर्माण झाला. नारदमुनी थांबले व त्यांनी त्या डुकरास विचारले, “चल माझ्याबरोबर. मी तुला स्वर्गात जागा देतो. सुखाने राहशील.’’ त्यावर त्या डुकराने विचारले, “पण तुमच्या त्या स्वर्गात चिखल आणि गटार आहे काय?’’ यावर नारदमुनी त्या डुकरास कोपरापासून दंडवत घालून पुढे निघाले. शेवटी संस्कार महत्त्वाचा ठरतो तो असा. पंतप्रधान मोदी चारेक दिवसांपूर्वी महाराष्ट्रात होते. तेथे ते म्हणाले, “काँग्रेस हे कारल्यासारखे कडू आहे. त्यास साखरेच्या पाकात घोळा नाहीतर तुपात तळा, ते कडूच राहणार.’’ मोदी यांना गुळाची चव नाही, तशी कारल्याची चव नसावी. कारले हे आयुर्वेदात गुणकारी म्हणून मानले जाते व या ‘कडू कारल्या’मुळेच ब्रिटिशांना भारत सोडून जावे लागले. आता कारल्याचा कडू रस मोदी यांनाही प्यावा लागत असल्याने ते ‘कडू’ शब्दांचा वापर करून प्रचाराचा स्तर खाली आणत आहेत. ब्रिटिश गेले तसे मोदीही जातील. मोदी आता म्हणतात, इंडिया आघाडीचे लोक मुघल विचारांचे आहेत. हे लोक श्रावणात मटण वगैरे खातात. पंतप्रधान पदावरील व्यक्ती प्रचारात मटण, कारले वगैरे विषय आणत आहे. याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत मोदी यांच्याकडून काहीच भरीव कार्य घडलेले नाही. एका बाजूला राहुल गांधी हे
हे वाचले का पोलीस तपासात मोठे यश; सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्यांचे फोटो आले समोर