Uddhav Thackeray : 6 खासदारांनंतर आता ‘हा’ बडा नेता सोडणार ठाकरेंची साथ? राजकीय वर्तुळात खळबळ
शिवसेना ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांत पक्षाला (Uddhav Thackeray) एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. नुकतीच ठाकरे गटात मोठी फूट पडली असून, ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांत पक्षाला (Uddhav Thackeray) एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. नुकतीच ठाकरे गटात मोठी फूट पडली असून, ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
या सर्व बंडखोर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे, सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे संकट कमी की काय म्हणून, आता ठाकरे गटाचे उरलेले आमदार आणि मुंबई महानगरपालिकेतील (BMC) माजी नगरसेवकही आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी मोठे धक्के बसणार का? अशी चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे.
उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आणि नाराजी
खासदार आणि आमदारांच्या पक्षांतरानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. जर त्यांनी पक्षांतर केले, तर हा ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा आघात ठरेल.
या संपूर्ण प्रकरणावर अखेर शुभांगी पाटील यांनी स्वतः समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे पूर्णपणे खंडण केले आहे. “मी सध्या कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. ज्या दिवशी मला असा निर्णय घ्यायचा असेल, त्या दिवशी मी सर्वांना अधिकृतपणे सांगूनच प्रवेश करेन.
सध्या राज्यात कुठल्याही निवडणुका नाहीत किंवा कोणताही अर्ज भरायचा नाही, त्यामुळे आता पक्षप्रवेशाचा प्रश्नच उद्भवत नाही.” त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे राज्यभरात काम सुरू आहे. ज्या दिवशी शिक्षकांच्या समस्या पूर्णपणे समजून घेतल्या जातील, त्या दिवशी सर्वांशी चर्चा करून पत्रकारांना नक्की माहिती दिली जाईल.
“उद्धव आणि आदित्य ठाकरे वेळ देत नाहीत…”
पक्षांतराच्या अफवा जरी त्यांनी फेटाळल्या असल्या, तरी शुभांगी पाटील यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेतृत्वावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत किंवा आदित्य ठाकरे वेळ देत नाहीत, ही कार्यकर्त्यांची भावना खरी आहे. त्यामुळे नक्कीच याबाबत कुठेतरी पाणी मुरत आहे.”
शुभांगी पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्या पक्षात जरी असल्या, तरी नाराज आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) ही धुसफूस भविष्यात काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






