Vaibhav Suryavanshi Record : वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीचा धमाका! ३६ चेंडूत ठोकले शतक; सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला
Vaibhav Suryavanshi Record : हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना वैभवने अवघ्या ३६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या स्फोटक खेळीत त्याने १२ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार लगावले.

Vaibhav Suryavanshi Record in IPL 2026 : क्रिकेटच्या जगात सध्या एका १५ वर्षांच्या मुलाने असा काही धुमाकूळ घातला आहे की, भलेभले दिग्गजही अवाक झाले आहेत. राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने आयपीएल २०२६ च्या ३६ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ऐतिहासिक खेळी साकारली आहे. ज्यामध्ये त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
वैभव सूर्यवंशीने ठोकलं शतकं –
राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात म्हणजेच जयपूरमध्ये वैभव सूर्यवंशी नावाचे एक वादळ घोंघावले. हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना वैभवने अवघ्या ३६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या स्फोटक खेळीत त्याने १२ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार लगावले. विशेष म्हणजे, अवघ्या १५ चेंडूत त्याने अर्धशतकाचा टप्पा ओलांडून सर्वांनाच चकित केले. हे वैभवचे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक आहे.
Innings Break!
Vaibhav Sooryavanshi’s spectacular century powers #RR to 2️⃣2️⃣8️⃣
Will #SRH chase it down?
Updates ▶️ https://t.co/PVdpjhxVEy#TATAIPL | #KhelBindaas | #RRvSRH pic.twitter.com/driUWGmMpr
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
सचिन तेंडुलकरला टाकले मागे –
1⃣0⃣3⃣(37) of absolute FORCE 🫶
We are short of words, Vaibhav Sooryavanshi 🫡
Updates ▶️ https://t.co/PVdpjhxVEy#TATAIPL | #KhelBindaas | #RRvSRH | @rajasthanroyals pic.twitter.com/HRjVHZyRa3
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
या सामन्यात ४५ धावा पूर्ण करताच वैभव सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू (१५ वर्षे २९ दिवस) ठरला आहे. तसेच, सर्वात वेगवान १००० धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत त्याने २६ व्या डावात हा पल्ला गाठून सचिन तेंडुलकरलाही (३१ डाव) मागे टाकले आहे.
आयपीएल २०२६ मधील जबरदस्त फॉर्म –
वैभवने आतापर्यंत आयपीएल २०२६ च्या सात सामन्यांत ३५७ धावा केल्या असून, त्याचा स्ट्राइक रेट २०० च्या वर आहे. गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये त्याने ३५ चेंडूत शतक ठोकत टी-२० क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान मिळवला होता. आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने केवळ राजस्थान रॉयल्सलाच नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या भविष्याला नवी दिशा दिली आहे.





