Manipur violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ; ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, प्रशासनाने कर्फ्यू लागू
Manipur violence: मणिपूरमधील उखरुलमध्ये हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे. लिटन सारीखोंग गावात सशस्त्र हल्लेखोरांनी अनेक घरांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे.

Manipur violence: मणिपूरमधील उखरुलमध्ये हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे. लिटन सारीखोंग गावात सशस्त्र हल्लेखोरांनी अनेक घरांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील हिंसाचार आणि अफवा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे. एवढेच नाही तर पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, डोंगराळ गावाजवळ सशस्त्र गटांनी हवेत अनेक गोळीबार केला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. अनेक गावकरी जीवनावश्यक वस्तू घेऊन शेजारच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील सुरक्षित भागात पळून गेले, तर तंगखुल गावातील अनेक ग्रामस्थांनीही परिसर सोडल्याचे वृत्त आहे.
‘पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद’ Manipur violence:
कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थिती लक्षात घेता, मणिपूर सरकारच्या गृह आयुक्तांनी उखरुल जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्काळ पाच दिवसांसाठी बंद करण्याचा आदेश जारी केला आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता आणि शांततेला धोका निर्माण झाला आहे.
आदेशात असे म्हटले आहे की अलीकडील घटनांमुळे लक्षणीय अशांतता निर्माण झाली आहे आणि चुकीच्या माहितीचा प्रसार तणाव वाढवू शकतो. त्यामुळे परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि अफवांना रोखण्यासाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात येत आहेत.
शनिवारचा हिंसाचार सुरू झाला Manipur violence:
उखरुलमध्ये शनिवारी रात्री सात ते आठ जणांनी लीटन गावात टांगखुल नागा समुदायातील एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप असल्याने हिंसाचार सुरू झाला, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर तोडगा निघण्याची अपेक्षा असताना, रविवारी होणारी बैठक होऊ शकली नाही.
त्यानंतर, सोमवारी मध्यरात्री, काही सशस्त्र हल्लेखोरांनी लीटन सरायखोंग येथील टांगखुल नागा समुदायाच्या घरांना आग लावली, त्यानंतर नागा समुदायाने कुकी समुदायाच्या घरांना लक्ष्य केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, के. लुंगविराम गावातील एक घरही अंशतः जळाले.
पोलिसांच्या प्रेस रिलीजनुसार, सोमवारी पहाटे १२:१० वाजता के. लुंगविराम गावात एक छोटीशी आग लागली, ज्यामुळे एका निवासी घराचे अंशतः नुकसान झाले. सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी सांगितले की आगीचे कारण तपासात आहे आणि परिस्थिती सामान्य आहे.






