Top 10 News : ‘ऑपरेशन टायगर 3’ने ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? , महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द आणि ‘आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..’ , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

‘ऑपरेशन टायगर 3’ने ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार?
10 आमदारांचे मतपरिवर्तनाच दावा
Top 10 News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ‘ऑपरेशन टायगर-3’ राबवण्याच्या तयारीत असून, ठाकरे गटातील सुमारे 10 आमदारांशी संपर्क झाल्याचा दावा केला जात आहे. पक्षांतरबंदी कायद्यातील अडचणी टाळण्यासाठी आणखी काही आमदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातील एका खासदारासह शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदारांशीही संपर्क असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि ॲड. निलेश देशमुख यांच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सर्व दाव्यांना अजून तरी कोणतीही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मिळालेली नाही.
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द
शरद पवारांकडून रोहित पवारांचे अभिनंदन
महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. 50 हजार रुपयांची लाभमर्यादा वाढवून 2 लाख रुपये करण्यासह 2026-27 चे पीक कर्ज भरण्याची अट रद्द केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. या निर्णयासाठी लढा उभारणाऱ्या शेतकरी संघटना, नेते आणि आमदार रोहित पवार यांचेही त्यांनी अभिनंदन केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
तुमच्या भ्रष्टाचाराने राज्याची बदनामी केलीय
नाना पटोले यांची सरकारवर टीका
राज्यातील शेतकरी सरकारविरोधात गेला असून जनतेचा सरकारवरील विश्वास उडाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. कर्जमाफीतील दोन अटी रद्द करण्याचे स्वागत करतानाच त्यांनी सरसकट कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी कायम असल्याचे सांगितले. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात प्रति किमी 540 कोटी रुपये खर्च करूनही त्रुटी राहिल्या असून हा भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यातील देवस्थानांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सत्तेच्या नावाखाली लूट सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली.
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली
देवेंद्र फडणवीसांनी मोशी दुर्घटनेचा घेतला आढावा
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेला 64 तास उलटूनही बचावकार्य सुरू आहे. ढाचा कधीही कोसळण्याची शक्यता असतानाही जवान अत्याधुनिक कटरच्या मदतीने शोधमोहीम राबवत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्यातून 23 पैकी 15 कामगारांना बाहेर काढण्यात आले असून, आठ जण अद्याप स्लॅबखाली अडकल्याची शक्यता आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवल्यानंतर आता पहिल्या मजल्यावरील पाडकाम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थितीचा आढावा घेत मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. बचावकार्य आज रात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत ‘कॅग’चा मोठा खुलासा;
तब्बल ३,५०० कोटींचा जादा खर्च Top 10 News :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक नियोजनावर नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 2024-25 मध्ये योजनेसाठी उपलब्ध 29 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 33 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, सडे तीन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे अहवालात नमूद आहे. या खर्चाबाबत महिला व बालविकास विभागाने कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिले नसल्याचे कॅगने म्हटले आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत 15,586 कोटी रुपये व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट खात्यांमध्ये वळवण्यात आल्याने अर्थसंकल्पीय शिस्तीचा भंग झाल्याचे निरीक्षण नोंदवत, मोठ्या डीबीटी योजनांसाठी अचूक आर्थिक नियोजन व गरजेनुसारच निधी वितरित करण्याची शिफारस कॅगने केली आहे.
राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक;
‘या’ कारणामुळे गायब झाले ढग
राज्यात दमदार पुनरागमन केलेल्या मान्सूनला पुन्हा ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ सक्रिय होणे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने 10 ते 15 जुलैदरम्यान पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 10 जुलैपासून मुंबई-कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून, 19 जुलैपर्यंतही हीच स्थिती कायम राहू शकते. दरम्यान, मुंबई-कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बिहारमधील भाजपचं सरकार कोसळणार?
नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं
बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. जनशक्ती जनता दलाचे (JJD) अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी राज्यातील एनडीए सरकार लवकरच कोसळेल, असा दावा करत खळबळ उडवली आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार बदलल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडली असून, आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, तेज प्रताप यादव यांच्या दाव्याला अद्याप भाजप किंवा जेडीयूकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
” अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही,”
इराणची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका
अमेरिका-इराण संबंधांतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानंतरही इराणने अमेरिकेवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी, अमेरिका करारातून माघार घेतल्यास किंवा विश्वासघात केल्यास इराण पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचा इशारा दिला. त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनाही याबाबत स्पष्ट भूमिका सांगितल्याचा दावा केला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचे जाहीर करत चर्चेबाबत महत्त्वाचे निवेदन जारी केले आहे.
स्पेन १६ वर्षानंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत;
बेल्जियमचे आव्हान संपुष्टात
स्पेनने बेल्जियमचा 2-1 असा पराभव करत फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फॅबियन रुईजने स्पेनला आघाडी मिळवून दिल्यानंतर चार्ल्स डी केटेलारेने बरोबरी साधली. मात्र, 88व्या मिनिटाला मिकेल मेरिनोने विजयी गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला. बाद फेरीतील सलग दोन सामन्यांच्या अखेरच्या पाच मिनिटांत विजयी गोल करणारा मेरिनो वर्ल्ड कप इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. दरम्यान, लामिने यमालने 19 वर्षांपूर्वी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सहा सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर करत नॉर्मन व्हाइटसाइडचा विक्रम मोडला.
‘आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..’;
कुनिका सदानंदची संतप्त प्रतिक्रिया Top 10 News :
मिसिंग लिंक प्रकल्पावरून विधानसभेत झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी टीका केली आहे. विरोधकांना ‘भाड्याचे टट्टू’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी, “सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. तुम्ही महाराष्ट्र नाही, तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी निवडून आलेले आहात,” असे म्हटले. तसेच, हजारो कोटींच्या प्रकल्पातील कामाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना ‘पैसे घेणारे ट्रोल’ म्हणणे लोकशाहीला धरून नसल्याची टीकाही त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली.




