तिरुपती मंदिराच्या प्रसादात आढळले किडे ; भक्ताच्या दाव्यावर टीटीडी बोर्डाने काय दिले उत्तर? वाचा

Tirumala Tirupati Devasthanams । मागच्या काही दिवसापासून भगवान व्यंकटेश्वर तिरुपती मंदिर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा मंदिराच्या प्रसादात किडे सापडल्याचा दावा एका भक्ताने केला आहे. मात्र दुसरीकडे भक्ताचा हा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानमने भक्ताने केलेला हा दावा (TTD) फेटाळून लावला आहे.
बुधवारी दुपारी दीड वाजता मंदिरात जेवण सुरू असताना ही घटना घडली. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, एका भक्ताने तक्रार केली होती की त्याला त्याच्या दही भातामध्ये सेंटीपीड सापडले आहे.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण Tirumala Tirupati Devasthanams ।
‘चंदू’ असे या भक्ताचे नाव असून तो वारंगळ येथून मंदिरात दर्शनासाठी आला होता. यादरम्यान ते म्हणाले, ‘जेव्हा मी कर्मचाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया धक्कादायक होती. ते म्हणाले कि, “असे कधी कधी घडते.”
चंदू पुढे म्हणाले, “प्रसाद देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पानातून हा कीटक आला असावा, असा दावा मंदिर प्रशासनाने केला होता.” ते पुढे म्हणाले की, हा निष्काळजीपणा अस्वीकारार्ह आहे. मुलांनी आणि इतर लोकांनी ते खाल्ले असते तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
टीटीडीने आरोप फेटाळून लावले आहेत Tirumala Tirupati Devasthanams ।
टीटीडीने आरोप फेटाळले आहेत. त्यांनी हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. मंदिरात दररोज हजारो लोकांसाठी प्रसाद ताजा तयार केला जातो यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, “श्रीवारी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी टीटीडी गरम अन्नाचा प्रसाद तयार करते. अशा परिस्थितीत एक शतपावली अन्नपदार्थात पडू शकते हा दावा चुकीचा आहे.” टीटीडीने असा दावा केला की प्रसादाबाबतची तक्रार भक्तांना त्यांच्या भगवान व्यंकटेश्वरावरील विश्वासापासून दूर करण्याचा प्रयत्न आहे. संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे.
हेही वाचा
भाजप नेते ब्रिजभूषण सिंह म्हणाले,’हरियाणावर बोलण्यास मनाई…’





